दास्तान ए हिंदुस्तान भाग ३( उदयपुरी मनोरम सूर्यास्त आणि भव्य रेणकपूर जैन मंदीर )
http://www.misalpav.com/node/21196 भाग १
http://www.misalpav.com/node/21265 भाग २

सिटी पेलेस
चंद्रोदय व चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेले उदयपुर


सकाळी आम्ही उदय पूर सोडले आणि गाडी रानकपूरच्या दिशेने जाऊ निघाली.रानकपूर हे अरवलीच्या पर्वत रांगामध्ये वसले असून जैनच्या पा
च पवित्र तीर्थशेत्रांपैकी एक आहे: येथील प्रमुख आकर्षण रानकपूर जैन मंदिर आहे: राणा कुंभाच्या कारकिर्दीत त्यांच्या मदतीने त्याकाळातील सर्वात श्रीमंत भारतीय जो एक जैन व्यापारी होता सेठ धरणा साह ह्याने पंधराव्या
शतकात जैनांचे सर्वात मोठे जगप्रसिध्ध मंदिर उभारण्यात आले:म्हणूनच राणा कुंभाच्या आदराप्रीत्यार्थ ह्या जागेचे नाव रानकपुर पडले. व आजही त्यांच्या पवित्र दिवशी ह्या धारणा साह च्या परिवारातील वंशज ह्या मंदिरात येऊन पूजा करतात. :
त्या काळात मंदिर निर्मितीला पन्नास वर्ष लागली: व खर्च त्या काळात एक कोटी रुपये आला:मंदिराच्या आजूबाजूला जंगल असून सर्वत्र घनदाट वनराई आहे.
चार मुखी मंदिर भगवान ऋषभदेवाला समर्पित असून मंदिर्याच्या मुख्य मंडपात जैनांचे पहिले तीर्थकर आदिनाथ ह्यांच्या संगमरावराच्या चार भव्य अश्य७२ इंची मुर्त्या मंदिराच्या चारही बाजूंना आहेत: म्हणूनच ह्या मंदिराला चतुर्मुख जैन मंदिर व रिषभदेव जैन मंदिर म्हणतात: मंदिर्याच्या चार भव्य प्रवेश दारांपैकी पुढील दारातून आम्ही आता प्रवेश केला: ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे १४४४ संगमरवरी नक्षीदार खांब आहेत.जेथे पाहावे थेथे खांबच खांब दिसत होते.आणि त्यांची रचन अश्या खुबीने केली आहे कि कुठंही मंदिराचे मुख्य प्रार्थना स्थळ दिसते. आणि प्रत्येक खांबावर वेगळे नक्षीकाम केले आहे. मंदिरात २४ मोठ्या खोल्या आहेत.मंदिराच्या मंडपात जैनच्या २४ तीर्थकरांची शिल्पे कोरली आहेत. मंदिरात चार मोठे प्रार्थनेसाठी मंडप आणि चार पूजाअर्चा करण्याचे मंडप आहेत. मंदिराच्या भव्य आवारात नेमीनाथ आणि पारसनाथ ,सूर्य , आणि आंबा मातेचे अशी अन्य मंदिरे सुद्धा आहेत. ज्यावरील नक्षीकाम खाजुरावो च्या शैलीत केले आहे. आणि ८ व्या शतकात बांधलेल्या सूर्य मंदिरात योद्धे आणि घोड्याची शिल्पे साकारली आहेत.


हे चित्र पाहुन मान काही केल्या खाली करवत नव्हती .

येथील मुख्य पुजार्याने अजून एक महत्वाची माहिती दिली कि मुघल आक्रमणात मंदिरातील प्रमुख मुर्त्या तळघरात लपवून ठेवल्या. पुढे अनेक वर्षानंतर ह्यातील काही मुर्त्या शोधून वर परत प्रस्थपित करण्यात आल्या.
मात्र अनेक मूर्त्यांचा अजून शोध लागला नाही आहे. ह्या तळघरात मुख्य पुजारी ध्यान करतात. त्यांनी पुढे मंदिराच्या उत्तरेला स्थित रायन झाड दाखवले. अत्यंत प्राचीन . ह्या झाडाच्या बुंध्याशी नैसर्गिक अवस्थेत गणेशाचे शिल्प आहे. ते पाहतच माझे हात आपसुकच जोडल्या गेले. ह्या शिवाय संगमरवरी तुकड्यावर ऋषभ देवाचे पायाची चिन्हे दिसून येतात. ह्या दोन मजली मंदिरात अनेक तळघरे आहेत. ती त्याकाळातील भावी परकीय आक्रमणांचा विचार करून हि तळघरे बांधण्यात आली. 
गणपती बाप्पा मोरया .( नैसर्गिक स्वरुपात प्रकटलेला गणराया )


रणकपुरात आम्ही रमलो होतो. पण आम्हाला मनावर केम्पात जायचे होते. हा केंम्प भर वाळवंटात उभारला होता. आणि एक राजेशाही अनुभव घेण्य आम्ही आतुर झालो होतो. येथे जवळच रणकपूर चे अभयारण्य होते. पण लवकरच भारतातील प्रसिद्ध रंथांभोर ह्या वाघांच्या गुहेत आम्ही जंगल सफारी करणार होतो. म्हणून तो मोह टाळून मानवर केंपाकडे मार्गस्थ झालो.

प्रतिक्रिया
व्वा ! मस्तच.....
सुंदर माहिती....
सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी"====
मस्त रे धन्यवाद.
मस्त रे धन्यवाद.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
मस्त रे निनाद.
मस्त रे निनाद.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
छान
वाचतो आहे!
व्वा ,बसल्या बसल्या सफर घडवत
व्वा ,बसल्या बसल्या सफर घडवत आहेस आम्हाला

अजुन येउ देत
पियुशा......
http://lovelypiyu.blogspot.com
खूपच छान!
राजस्थानची सफर आवडते आहे!
>>>गणपती बाप्पा मोरया .(
>>>गणपती बाप्पा मोरया .( नैसर्गिक स्वरुपात प्रकटलेला गणराया )
कुठे आहे हो? मला तरी दिसला नाही.

मंदीर जादुई आहे. हा भाग सगळ्यात भारदस्त.
पण वृत्तांत थोडासा जास्त आणि शब्द काळजीपूर्वक लिहा की जरा, टायपो झालेल्या शब्दांवर गेले की नजरेला उगाच ठेच लागून अडखळल्यासारखे होते
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
अरे हा भाग घाई घाईत
वेळ मिळाला की संपादन करतो
सूचनेबद्दल धन्यवाद .थोडे आणखी फोटो टाकतो. ( फोटो उदंड जाहले.)
रोप वे ( अरवली च्या डोंगर रांगा सह्याद्री ची आठवण करून देत होत्या.)
हे मंदिराच्या उत्तरेला असलेले रायन झाड ( हे अत्यंत प्राचीन आणि पवित्र झाड असून प्रत्येक भाविक आदरापोटी त्यास नमस्कार करत होते.)
दुसऱ्या मंदिराचा फोटो ( उरलेल्या ३ मंदिरांपैकी ह्या मंदिरांचे नाव कोणते हे आता खूप आठवून सुद्धा लक्षात येत नाही आहे.)
बॉलीवूड ने राजस्थान म्हणजे वाळवंट अशी आपली गोड गैरसमजूत करून दिली आहे.उदयपुर आणि त्याच्या सभोवतालचा मेवाड परिसर हा नेहमीच सदाहरित असतो.
आणी सरता शेवटी मंदिर पाहून प्रफुल्लीत झालेले आम्ही
जर्मनीत भारताच्या ट्रीप बद्दल माझी पत्नी आणी तिच्या बहिणीला एक प्रश्न त्यांचे सहकारी हमखास विचारतात " भारतातील तुमचा स्मरणीय क्षण किंवा अनुभव कोणता आहे.?
ह्यावर त्यांना अपेक्षित उत्तर ताजमहाल पाहतांना आलेली अनुभूती हे असते.
मात्र माझी पत्नी आणी तिच्या बहिणीचे उत्तर मात्र ह्या जैन मंदिरात व्यतीत केलेला काळ, खर तर त्याचे भानच आम्हाला राहिले नव्हते.
मंदिर संगमरवरी असल्यामुळे आत गारवा अनुभवयास मिळतो. चित्त आणी भान हरपून जाणे म्हणजे काय ह्यांचा प्रत्यय येथे येतो.. ताजमहालाच्या भिंतीवरील रत्ने, आभूषणे , माणिक ह्यांची लुटालूट झाल्याने
तो चित्रात दिसतो तेवढा काही आकर्षक वाटत नाही. किंबहुना तो चित्रातच सुंदर दिसतो. भारतातील आमच्या पाहण्यातील सर्वात आकर्षक वास्तु म्हणजे जोधपुर चा किल्ला. सदर किल्ला हा जोधपुर आणी उदयपुर च्या राजवाड्याहून अधिक लोभसवाणा आहे.. तो पुढील भागात पाहूया.
आपले आमच्या पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
यावेळचे फोटो जास्त
यावेळचे फोटो जास्त आवडले.
पहिले तीन तर भारीच आहेत.
वाचतेय
हा ही भाग छान, फोटो पण मस्त आहेत. सुरुवातीचे आणि संगमरवरी मंदिराचे फोटो खूपच सुरेख.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
सुंदर.. फुकटची सफर घडवून
सुंदर.. फुकटची सफर घडवून आणतोस रे मला..
- (सध्या तरी फुकट्या) पिंगू
- पिंगू
ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |
निनाद ..फोटोझ कुनि
निनाद ..फोटोझ कुनि घेतलेत?
छान आहेत एकदम ....
वाचतेय .....
०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====
♥ " मेरा पती ' पती '
... तेरा पती ' वनस्पती '
" ♥
मस्त ... फटू आवडल्या गेले
मस्त ... फटू आवडल्या गेले आहेत
____________________________________________________
I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
अधिक लोभसवाणा किल्ला कोणता ?
.......सदर किल्ला हा जोधपुर आणी उदयपुर च्या राजवाड्याहून अधिक लोभसवाणा आहे.. तो पुढील भागात पाहूया.....
हा किल्ला कोणता ? पुढील भाग बघण्यास उत्सुक.
राणकपूर चे मंदिर अद्याप बघायचे राहून गेले आहे, आता जायलाच हवे.
मस्त रे निनाद... फोटो मस्त
मस्त रे निनाद...
फोटो मस्त आहेत रे...
मदनबाण.....
जलतरंग :- रंजना प्रधान {मी आत्ता पर्यंत ऐकलेले सर्वात सुंदर जलतरंग वादन }