एक कविता

ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला…

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे

hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute

computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते face book.....!!

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

ह्या कवितेला पहिला नंबर..:-O :-O :-O
कठीण आहे हो.
परिक्षक कोण होते?

--------------------------------------------------------------
ऊर्ध्वासः पिबति जलं यथा यथा विरलाङगुलिश्चिरं पथिकः |
प्रपापालिकापि तथा तथा धारां तनुकामपि तनुकरोति ||

०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||

भाव पोहोचला

.....................................................................................................
कविता हीच ओळख

आवडली कविता......

..........................................................................................................................................................
सुनो नन्द''जिधर कभी कोई रास्ता बनाकर ना चला,
उस तरफ हि रास्ता बनाकर चलना''

अजय

श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी चुकुन "फुलबाग" / "ऊमलत्या कळ्या (?)" छाप काव्यस्पर्धेत भाग घेतला होता कि काय ?ढकलपत्र म्हणून ठिक आहे.ह्या कवितेला पहिला नंबर मिळाला असेल तर क्र.२ आणि ३ / ४ / ५ च्या कविता ही द्याव्या.
जरा करमणूक.

- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.