अर्धसत्य
प्रेषक, अज्ञातकुल, Fri, 06/01/2012 - 15:17
मंतरलेली शीळ कुठुनशी
चित्तसदन मन होते मंथर
अंदोलत उलगडते प्रतिमा
झुळुक मिटविते पुरते अंतर
कोष रेशमी लय कांचनमय
रात्र झुलविते रास निशाचर
गोत्र मिरविते मोरपिसांचे
अमानवी संस्कार शिरावर
मिटल्या डोळ्यां-आंत सरोवर
झुरते काजळ उभय तिरांवर
जाग मत्सरी येते अवचित
अर्धसत्य मग होते गोचर
..............अज्ञात
काव्यरस:
लेखनविषय::
प्रतिक्रिया
__/\__
__/\__
=====================================
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
आम्ही सध्या लेखणी म्यान केली आहे.
उफ़्फ़... ये गालिब!!
छान
छान
***************************************
- मन्या फेणे
मस्त कविता
मस्त कविता
निश
जाग मत्सरी येते
जाग मत्सरी येते अवचित
अर्धसत्य मग होते गोचर
हे कळाले नाही
त्यामुळे कवितेचा आशय साधारणपणे समजला तरी पूर्ण कविता अॅप्रिशियेट करता आली नाही...
कविनी येथे समजावून सांगावे अशी विनंती करते.
आपल्या विनंतीवरून रसग्रहणाचा
आपल्या विनंतीवरून रसग्रहणाचा एक अल्पमती प्रयत्न...................
शान्त एकांत. तो स्वतःत मग्न. श्वासांवर लक्ष. सभोवताल नीरव; जगृतीच्या प्रतीक्षेत. अर्धस्फुट पहाट. उजाडू पहातंय.
दूर कुठून कुण्या पक्षाची; नाजुक-हलकी-मायावी शीळ ऐकू येते आणि "एकाग्रतेचं माहेरघर मन" विचलित होतं. हळव्या अंदोलनांमधून अंतर्मनातील सुप्त प्रतिमा उलगडू लागते. दरवळणारी मंद झुळुक; "काल आणि आज" मधलं अंतर मिटवून त्याला गतकाळात घेऊन जाते.
सुवर्णमयी तंतूंनी विणलेली तलम रेशमी क्षणांची लय आणि रात्र झुलविणारी निशाचर रास आठवून; मोरपिसाचं ईश्वरी (अमानवी) गोत्र (कृष्णलीला) शिरावर मिरवू लागतं.
अशा भारावलेल्या अवस्थेत, मिटल्या डोळ्यांत ओथंबलेलं सरोवर; काठांचं काजळ झिजवू लागतं. इतक्यात नियतीचा मत्सर त्याला ह्या अमृतसमाधीतून जागा करतो आणि चरितार्थासाठी जगणारं वास्तव, "दुसरं अर्धसत्य", कर्यान्वित (गोचर) होतं.
........................अज्ञात
http://adnyaatvaasclkul.blogspot.in/http://www.cielbusinesscircle.blogsp...
@रसग्रहणाचा एक अल्पमती
@रसग्रहणाचा एक अल्पमती प्रयत्न...>>> व्वाहवा कुल...! रसग्रहणालाही सलाम आपला...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
जाग मत्सरी येते
जाग मत्सरी येते अवचित
अर्धसत्य मग होते गोचर ......... व्वा व्वा..! इस की तो कुछ बात ही और है..! मंत्रमुग्ध की कायसं म्हणतात ना,ते व्हायला झालं....!
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
छान कविता.
लयदार काव्य, अचुक शब्द रचना. वाचतानाच तालमय अनुभव येतो.
कविता सादर केल्याबद्दल आभार.
-अभिजीत राजवाडे
(मालकंस)