गाभा:
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार.
https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-cou...
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार.
https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-cou...
प्रतिक्रिया
13 Feb 2018 - 9:14 am | नाखु
इंडियन एअर फोर्सची राफेल विमान खरेदीची मागणी सत्तेवर असताना चक्क 10 वर्षे काँग्रेसला पुरी करता आली नाही आणि मोदींनी मात्र त्या विषयाला हात घातला आणि अवघ्या एका वर्षात विमान खरेदीचा करार केलासुद्धा आणि तोसुध्दा काँग्रेस खरेदी करत होती त्यापेक्षा तब्बल 12600 कोटी रुपये देशाचे वाचवून। हिच खरी त्यांच्या आजच्या कोल्हेकुईची खरी कारणे आहेत। म्हणे राफेल विमान खरेदीमध्ये मोदींनी भ्रष्टाचार केलाय। देशातील किती जनता तुमचा हा आरोप गंभीरपणे घेतेय हे तरी जरा निरखून पहा।
कट्टर मोदी विरोधक लोकसत्ताने काल काय बातमी दिलीय ती वाचाच-" मोदी सरकारचा राफेल करार काँग्रेसपेक्षा 2268 कोटी रुपयांनी स्वस्त" असा मथळा देऊन लोकसत्ता म्हणतो- मोदी सरकारने केलेल्या करारानुसार एका राफेल लढाऊ विमानासाठी 91 दश लक्ष युरो किंवा 717 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत। हा 36 विमानांचा करार असून 25812 कोटी रुपये भारताला मोजवे लागणार आहेत। युपीए सरकारच्या करारानुसार एका विमानासाठी 99 दश लक्ष किंवा 780 कोटी रुपये मोजावे लागणार होते। त्यामुळे नवीन करारानुसार प्रति राफेल विमान 63 कोटी रुपये वाचणार आहेत। एकूण 36 विमानांच्या खरेदीचा विचार करता भारताची नवीन करारानुसार 2268 कोटीची बचत होणार आहे।
लोकसत्ताने इंडिया टुडे सूत्रांचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे। इंडिया टुडेने विविध सुत्रांबरोबर चर्चा करून ही माहिती मिळवलीय। सुटे भाग आणि देखभाल खर्च मिळून 36 विमानासाठी 25812 कोटी खर्च येईल। युपीएचा करार कायम ठेवला असता तर सरकारला आता 28080 कोटी मोजावे लागले असते। मोदी सरकारने 2015 मध्ये युपीएचा 126 विमानांचा करार रद्द केला आणि 36 विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला। कारण त्या करारात अनेक विसंगती होत्या।
जेव्हा आपला देश 126 विमानं फ्रान्सकडून खरेदी करेल तेव्हा युपीए सरकारच्या तेव्हाच्या खरेदीपेक्षा आताचं मोदी सरकार देशाची किती रक्कम वाचवेल याची राहुल गांधींना कल्पना तरी आहे का ? तब्बल 7938 कोटी रुपये म्हणजे चक्क 10 विमाने मोफत मिळतील। युपीए सरकारनेच 2008 मध्ये फ्रान्सशी गुप्ततेचा करार केला होता म्हणून लोकसभेत सखोल माहिती देणे योग्य नाही हेही राहुलना माहीत नाही म्हणायचं का ? उचलली जीभ लावली टाळ्याला केल्यामुळे त्यांची जनमानसातील विश्वासार्हता मात्र पणाला लागलीय।
संजीव पेडणेकर
संदर्भ- लोकसत्ता 9/2/2018
14 Feb 2018 - 9:25 pm | सर टोबी
या प्रतिसादानुसार https://www.misalpav.com/comment/982157#comment-982157 खरेदीची किंमत अजूनतरी गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे नमो भक्तांचा अजून एक अविष्कार यापेक्षा काय वेगळे वर्णन करणार?
हा करार मागील सरकार दहा वर्ष करीत होतं याचा काही विशेष दुवा आहे का? आणि सध्याच्या सरकारने हा करार लवकरात लवकर पूर्ण केला याचे कारण मागील सरकारने मसुदा तयारच ठेवला होता. विमान खरेदी म्हणजे 'केवढ्याला दिली विमानं' इतकी सोपी नसावी अशी आमची समजूत आहे.
13 Feb 2018 - 9:16 am | प्रचेतस
आज, मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी निशिथकालात म्हणजे रात्री १२.२८ ते उत्तररात्री १.१८ या कालात माघ कृष्ण चतुर्दशी आहे, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. आज, शिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर एकच चमचा दूध वाहून उरलेल्या दुधाचा प्रसाद म्हणून द्यावा, पिशवीभर दूध शंकराच्या पिंडीवर ओतू नये, असे आवाहन सोमण यांनी शिवभक्ताना केले.
ब्रह्माने सृष्टी निर्माण केली. विष्णू पालन करतो आणि भगवान शंकर सृष्टीतील वाईट गोष्टींचा लय करतो, अशी श्रद्धा आहे. आपल्यातील वाईट गोष्टींचा लय व्हावा, यासाठीच शिवपूजन करावयाचे असते. रात्री आकाशात मृग- व्याधाचे दर्शनही घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
13 Feb 2018 - 9:24 am | अर्धवटराव
तुमच्या वतीने हा ट्वीट का आला कळलं नाहि :) कहना क्या चाहते हो भाई ??
13 Feb 2018 - 9:27 am | प्रचेतस
ताजी घडामोड म्हणून :)
13 Feb 2018 - 10:19 am | डॉ सुहास म्हात्रे
:)
13 Feb 2018 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्रम्ह विष्णू आणि महेश या सर्व कवी कल्पना आहेत. आम्ही कुठेही शिवपूजा वगैरे करणार नाही. धन्यवाद.
मोदींच्या सभांसाठी वकिलातींचा गैरवापर. मा. नरेंदरजी मोदी हे विदेश दौर्यावर भारतीयांची सभांना गर्दी व्हावी म्हणून भारतीय वकिलातींचा गैरवापर करत असल्याचे म्हटल्या जात आहे. मस्कत येथे मोदींच्या सभेसाठी भारतीय वकिलाताने तेथील उद्योजकांना आपल्या कामगारांना पाठविण्यासाठी पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या असे आरोप केला जात आहे. विदेश दौर्यावर असतांना आधीच्या सरकारांना बदनाम करण्याची परंपरा मोदींनी कायम राखली आहे असे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. ( बातमी सौजन्य दै. लोकमत)
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 9:42 am | प्रचेतस
मुंबई - राज्यातील पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेंतर्गत पुस्तके खरेदी करताना राज्याच्या शिक्षण विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमाचा वर्षाव केला आहे. थोर व्यक्तींपेक्षा मोदी यांच्या चरित्राची माहिती देणाऱ्या पुस्तकांवर चक्क 59 लाख 42 हजारांचा खर्च केल्याने हे प्रेम चर्चेत आले असून, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या पुस्तकांवर शिक्षण विभागाने मराठी भाषेतील 72 हजार 933 प्रती, इंग्रजीतील 7148, गुजरातीत 33 आणि हिंदीतील 425 प्रती खरेदी केल्या आहेत. मात्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी केवळ तीन लाख 25 हजार रुपये खर्च केले आहेत.
गांधीजींवरील पुस्तकांसाठी सम्राट प्रकाशनाकडून 2675 प्रती, डायमंड पॉकेटकडून गुजराती भाषेतील 33 प्रती, निशिगंध प्रकाशनाकडून 7260 प्रती शिक्षण विभागाने खरेदी केल्या आहेत; तर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 78 हजार 388 पुस्तक प्रतींसाठी 24 लाख 28 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्राची माहिती देणाऱ्या 78 हजार 348 प्रती शिक्षण विभागाने खरेदी केल्या. त्यासाठी 22 लाख 63 हजार रुपये रक्कम खर्च करण्यात आली.
खरेदी पारदर्शक - तावडे
पुस्तक खरेदीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली आहे. मोदी यांच्यावरील पुस्तके सर्वाधिक खरेदी केल्याचा दावा चुकीचा आहे. शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, शाहू महाराज आणि साने गुरुजी यांच्या चरित्रावरील पुस्तक खरेदीची संख्याही मोठी आहे, असा दावा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला; परंतु या पुस्तकांसाठी खर्च केलेली रक्कम त्यांनी सांगितली नाही. ( बातमी सौजन्य दै. सकाळ)
13 Feb 2018 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जम्मु : सुंजवा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यांसाठी थेटपणे पाकिस्तानला जबाबदार ठरवतांना संरक्षणमंत्री निर्मला सीताराम यांनी शेजारी देशाला या दु:साहसाची किंमत चुकवावी लागेल असा इशारा सोमवारी दिला. (दै. सकाळ)
[ हे सरकारही सालं पुंगट निघालं : प्रा.डॉ. ]
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 9:53 am | प्रचेतस
पुणे : विकासाचा मंत्र हा भाजप सरकारच्या धोरणाचा भाग आहे, परंतु त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा धोकादायक आहे, असे माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी येथे सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृह व न्यायसचिव आणि लेखक डॉ. माधव गोडबोले यांच्याशी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला. देशात २० टक्के अल्पसंख्यांक आहेत.
पुढील १०-१५ वर्षात ही संख्या ३०-३५ टक्क्यांपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे भारतात हिंदुत्व ही संकल्पना राबवण्याजोगी नाही. सरकारने धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवणे अत्यंत घातक आहे, अशा शब्दांत गोडबोले यांनी चिंता व्यक्त केली.
‘भाजपने लोकपाल विधेयकासाठी आंदोलन केले. त्यांचे सरकार येऊन ४ वर्षे झाल्यानंतरही याबाबत काहीच पावले उचलली गेली नाहीत. राजकीय टिपण्णीत अग्रेसर असलेला सोशल मीडिया विधायक बाबतीत सक्रिय दिसत नाही. बोलायचे पुष्कळ आणि करायचे काहीच नाही, हे चित्र आजही कायम आहे.
मुख्यमंत्री, पंतप्रधानांची काम करण्याची पध्दत बदलली आहे. कोणत्याही प्रकरणात ‘माझी दिशाभूल करण्यात आली’ असे म्हणण्याची फॅशन रुजली आहे.
लोकशाही अस्तित्वात आहे, तोवर उद्योगपतींना काय करू
द्यावे, काय करू देऊ नये, याचे
दंडक घातले पाहिजेत, अशी अपेक्षाही गोडबोले यांनी बोलून दाखविली.
...तर बाबरी मशीद वाचवता आली असती
बाबरी मशिदीचे पतन हा भारताला स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा धक्का होता. उत्तर प्रदेशातील राज्य सरकार बरखास्त करण्याची सूचना गृह विभागातर्फे करण्यात आली होती. सरकारला राष्ट्रपती राजवट लागू करता आली असती, असेझाले असते तर बाबरी मशीद वाचवता आली असती.
- माधव गोडबोले,
(दै. लोकमत)
माजी केंद्रीय गृहसचिव
13 Feb 2018 - 10:05 am | अर्धवटराव
बाबरी बद्दल इतक्या टोकाचा धक्का का बसतो लोकांना कळत नाहि :) अर्धा काश्मीर पाककडे जाणे, तिबेट, सियाचीन ड्रेगनने गिळणे, आणिबाणी, एका विद्यमान आणि एका भूतपूर्व (कदाचीत तत्कालीन भावी देखील ) पं.प्र.ची हत्या... शिवाय मिपावर आध्यात्म, अंधश्रद्धा वगैरे लेखन... अनेक धक्के बसलेत भारताला. बाबरीचं मॅग्नीट्युड मोठं होतच, पण सर्वात मोठं होतं असं वाटत नाहि. मुळात ते प्रकरण इतक्या लेव्हलला पोचायलाच नको होतं.
13 Feb 2018 - 10:09 am | प्रचेतस
बाबरीनंतरच जम्मू काश्मिरपर्यंतच मर्यादित असलेलं अतिरेक्यांचं लोण भारतभर पसरलं, इतर शहरांतही साखळी बॉम्बस्फोट घडू लागले, तोकाचं धृवीकरण होऊ लागल< ह्या घटना सर्वसामान्यांशी थेट निगडित असणार्या होत्या.
13 Feb 2018 - 10:22 am | अर्धवटराव
पण अतिरेक्यांचं लोण भारतात पसरणारच होतं. त्याची सोय २०व्या शतकाच्या पुर्वार्धात झाली होती. धृवीकरणाची प्रक्रीया बाबरीमुळे स्टिम्युलेट झाली हे खरं आहे. पण अदरवाइज ते काम एक-दोन दशकं उशीराने झालं असतं. बाबरीनामक समस्या मुळात उत्पन्नच व्हायला नको होती. पण तो व्हायरस आपल्या शरीरात होता. त्याचे परिणाम कधि होतील हा काळाचा प्रश्न होता.
13 Feb 2018 - 10:55 am | प्रचेतस
ते खरंच.
13 Feb 2018 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकशी चर्चेशिवाय पर्याय नाही : मेहबूबा.
श्रीनगरमधे भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात जोर्दार चकमक सुरु असतांना जम्मू काश्मीरच्या मूख्यमंत्री मेहबूबा मुफ़्ती यांनी राज्यातील हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान नव्याने चर्चा सुरु झाली पाहिजे असे मत व्यक्त केले . वृत्तवाहिन्यांचा समाचार घेतांना त्या म्हणाल्या की फ़ारुक अब्दुला आणि मेहबूबा मुफ़्ती पाकशी चर्चा करावी असे म्हणाले की त्यांना राष्ट्र विरोधी ठरवले जाते, मात्र, प्रश्न सोडविण्यासाठी चर्चेशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. रक्तपात थांबवायचा असेल तर पाकिस्तानशी चर्चा आवश्यक आहे. मला माहित आह ए, की व्रुत्तनिवेदक मला राष्ट्रविरोधी ठरवतील मात्र याने कोणताही फ़रक पडत नाही जम्मू काश्मीरच्या लोकांना त्रास होत आहे. युद्ध हा पर्याय नस्ल्यामुळे आपण चर्चा केली पाहिजे. (दै. सकाळ )
[ हेच दिवस बघायचे होते का तुम्हाला सत्ता देऊन कार्यवाही करा. प्रा.डॉ. ]
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 10:10 am | प्रचेतस
सिंदानूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टिप्पणी करताना म्हटले आहे, की मोदी हे यष्टीरक्षकाकडे पाहून फलंदाजी करतात, त्यामुळे त्यांना माहितच नसते की चेंडू कोठून येतोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘रियर व्ह्यू मिरर’ संबंधी वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी आता त्यांची क्रिकेटपटूशी तुलना केली आहे. मोदी हे असे क्रिकेटपटू आहेत जे, यष्टीरक्षकाकडे पाहत फलंदाजी करतात. त्यांना हे माहीत नसते की चेंडू कुठून येतोय. जर सचिन तेंडुलकरने यष्टीरक्षकाकडे पाहत फलंदाजी केली असतील तर त्याला धावा काढता आल्या असत्या का?
कर्नाटकमधील सभेत बोलताना राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले. आमचे पंतप्रधान असे क्रिकेटर आहेत जे विकेटकिपरकडे पाहतात आणि त्यांना हेही माहीत नसते की चेंडू कुठून येत आहे. मोदी भविष्याविषयी बोलण्याऐवजी भूतकाळावरच बोलत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपण्यास आता जास्त वेळ राहिला नसून, त्यांनी फक्त भाषणबाजी बंद करून काम करावे. पाच वर्षांत तुम्ही काय केले, हे तुम्हाला नागरिकांना सांगावे लागेल.
(दै. सकाळ)
13 Feb 2018 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फक्त भाषणबाजी बंद करून काम करावे. पाच वर्षांत तुम्ही काय केले, हे तुम्हाला नागरिकांना सांगावे लागेल.
खरंय...! तिकडे कच्च्या तेलाचे भाव गडगडले तरी आपले पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत नै ये. मला कंटाळा आला पेट्रोल भरायचा. लै जीवावर येतं दररोज हजार पाचशे रुपयांचे पेट्रोल भरायचं. ड्युटीला जाण्यापेक्षा घरी बसून राहावं वाटतं. काही विकास नका करु फक्त पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले तरी पुश्कळ आहे.
-दिलीप बिरुटे
(आदरणीय मोदीजींच्या भाषणाला पकलेला)
13 Feb 2018 - 10:22 am | प्रचेतस
http://www.esakal.com
चंदीगड : गेल्या काही वर्षांपासून 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोहिम राबवत निषेध करत आहेत. मात्र, या 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, ''तरुण पुरुष आणि महिलांना प्रेम करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे 'व्हॅलेंटाइन डे'ला कोणताही निषेध किंवा हिंसाचार होणार नाही''.
चंदीगड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ''प्रेम नाही केले तर विवाह होणार नाही आणि जर विवाह झाला नाही तर सृष्टी चालणार कशी? तरुण आणि तरूणींना प्रेम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, मला असे वाटते आपल्या मुलीला प्रेम करण्याचा हक्क आहे आणि आपल्या बहिणीलाही प्रेम करण्याचा अधिकार आहे. असे म्हणत यंदा 'व्हॅलेंटाइन डे'ला कोणताही निषेध किंवा हिंसाचार होणार नाही''.
गेल्या अनेक वर्षांपासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून 'व्हॅलेंटाइन डे'वर भारतात बंदी आणली जावी, यासाठी मागणी केली जात आहे. 'व्हॅलेंटाइन डे'ला त्यांच्याकडून हिंदूविरोधी आणि भारतविरोधी म्हणून संबोधले जात आहे.
दरम्यान, विहिपच्या या निर्णयामुळे 'व्हॅलेंटाइन डे'साठी तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना याचा फायदा होणार आहे.
(दै. सकाळ)
13 Feb 2018 - 10:30 am | पुंबा
ही टिपिकल 'सकाळगिरी' बघा..
13 Feb 2018 - 10:39 am | विशुमित
हाहाहा..!!
यात काय तयारी करणार आहेत ? आरास सजावणार का आता ?
13 Feb 2018 - 10:31 am | विशुमित
प्रा डॉ. तुमच्या ताज्या घडामोडी वाचून असे वाटतंय की ३-४ वर्ष आपण टाईम मशीन ने कोणत्यातरी युगामध्ये गेलो होता आणि आता पुन्हा पूर्वस्थितीत परतलो आहे.
13 Feb 2018 - 10:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय....!
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 10:32 am | विशुमित
प्रा डॉ आणि प्रचेतस असे वाचावे
16 Feb 2018 - 4:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्राडॉ अणि पचेतस यांची जुगलबंदी आवडली ! बातम्याही रोचक !! =)) =))
13 Feb 2018 - 10:58 am | सचिन७३८
विचार करण्याजोगी गोष्ट आहे. उलट २० टक्के वाढून ३० ते ३५ टक्के होणे हेच मुळात धर्मनिरपेक्षतेविरूद्ध आहे.
13 Feb 2018 - 10:07 am | अर्धवटराव
कदाचीत २०१९ निवडणुकांची पार्श्वभूमी असावी या प्रकरणाला... कोण जाणे.
13 Feb 2018 - 10:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्याच्या पुढील निवडणूकीत लोक इतकं खोलवर गाडतील ना की लोक विसरुन जातील. की कोणा थापाड्याचं सरकार आपण निवडून दिलं होतं.
प्रश्न पूर्वीही होते आताही आहेत. कोणत्या प्रश्नांना प्राधान्याने सोडवायला हवं ? सामान्य नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत ? त्यांचे रोज जीवनमरणाचे प्रश्न काय आहेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 10:54 am | प्रचेतस
देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक २२, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर ११ तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधात तीन गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे.
एडीआरने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून देशातील मुख्यमंत्र्यांवर दाखल असलेल्या गुन्हेगारी खटल्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. फडणवीस यांच्याविरोधात २२ गुन्हे आहेत. त्यातील तीन गंभीर स्वरुपाचे आहेत. तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर ११ खटले दाखल आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. त्यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. (सौजन्य-मटा)
13 Feb 2018 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुझफ्फरपूर : देश संकटात सापडला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीनच दिवसांमध्ये लष्कर उभे करू शकतो, असे वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथील संघाच्या शिबिरामध्ये बोलताना केल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
भारतीय लष्करास जे करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा अवधी लागतो, तेच लष्करी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम आमची संघटना तीन दिवसांमध्ये पूर्ण करू शकते. हीच आमची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशासमोर आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यानंतर राज्यघटनेने परवानगी दिली तर आमचे स्वयंसेवक युद्धाच्या आघाडीवरदेखील जातील. रा. स्व. संघ ही काही लष्करी अथवा निमलष्करी संघटना नसून, ते एक पारिवारिक संघटन आहे. येथे प्रत्येक स्वयंसेवक लष्कराच्या शिस्तीमध्ये वावरत असतो. आमचे स्वयंसेवक हे नेहमीच देशासाठी आनंदाने सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार असतात, असेही त्यांनी नमूद केले.
भागवत यांनी या वेळी स्वयंसेवकांना समाजामध्ये चांगली वर्तणूक ठेवण्याचे आवाहन केले. सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर स्वयंसेवकांनी आपले चारित्र्य जपावे आणि आपल्या वर्तणुकीतूनच समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. (दै. सकाळ)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय लष्करास जे करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा अवधी लागतो, तेच लष्करी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम आमची संघटना तीन दिवसांमध्ये पूर्ण करू शकते. हीच आमची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय लष्करावर आमचा विश्वास आहे. बाय द वे, हे टोपीवाले आणि त्यांच्या सर्व नेत्यांना खरडून सीमेवर पाठवा रे. पाहू तरी सैनिकांपेक्षा असे काय मोठे दिवे लावतात ते.....! प्रा.डॉ.
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 12:03 pm | प्रचेतस
लाडाचा जावई म्हणून सासुरवाडीची मंडळी जावयाचे सर्व चोचले पुरवतात. त्याला मानसन्मानही देतात. पण हाच जावई डोक्यावर बसू लागला तर त्याला चोप देण्यासही सासुरवाडीची मंडळी मागे पुढे पाहत नाहीत. अहमदाबादच्या बोटाडमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पत्नीसह मेव्हण्याच्या लग्नाला न जाणं या जावयाला भलतंच महागात पडलं आहे. मेव्हण्याच्या लग्नाला न आल्याचा राग मनात धरून सासुरवाडीच्या मंडळींनी या जावयाची धुलाई केली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदाबादच्या बोटाड येथे ही घटना घडली. पिनाकिन सोलंकी असं या जावयाचं नाव असून ते बँकेत कामाला आहेत. ५ फेब्रुवारी रोजी पिनाकिन यांचा मेव्हणा निलेशचा विवाह होता. त्याच दिवशी पिनाकिन यांची ऑफिसात प्री-प्रमोशन ट्रेनिंग होती. त्यामुळे ते पत्नी निकितासह अहमदाबादला लग्नाला जाऊ शकले नव्हते.
शनिवारी १० फेब्रुवारी रोजी पिनाकिन त्यांची आई शारदाबेन यांच्यासोबत पत्नीला घेण्यासाठी सासुरवाडीला आले होते. पण पिनाकिन यांना दारात पाहताच सासुरवाडीच्या मंडळींनी शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासरा, मेव्हणा आणि मेव्हणीने त्यांना आणि त्यांची आई शारदाबेन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. निकितानेही सासू आणि नवऱ्याला चोप दिला. त्यामुळे जखमी झालेल्या पिनाकिन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी चंद्रखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक अंकुर पटेल यांनी सांगितलं. (दै. मटा)
13 Feb 2018 - 12:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छेड काढलेल्या मुलीस 'पवित्र' करण्यासाठी तिचे कापले केस...!
रायपूर - छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यामधील एका 13 वर्षीय मुलीची छेड काढण्यात आल्यानंतर तिला पुन्हा "पवित्र' करण्यासाठी तिच्या समाजाने तिचे केस कापल्याची घटना घडली. दरम्यान, छेड काढणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आले आहे. या मुलीस पुन्हा पवित्र करुन घेण्याचा "विधी' करणाऱ्या समाजामधील आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
"गेल्या 21 जानेवारी रोजी अर्जुन यादव (वय 22) या आरोपीने पीडितेची छेड काढली. हा प्रकार कळताच या मुलीच्या पालकांनी पंचायतीमध्ये धाव घेतली. पंचायतीने दुसऱ्या दिवशी आरोपीकडून पाच हजार रुपयांचा दंड घेतला व प्रकरण निकालात काढले. मात्र यानंतर काही दिवसांनी बैगा आदिवासी या मुलीच्या समाजामधील काही जणांनी एक सभा घेत पालकांना संबंधित मुलगी अपवित्र झाल्याचे सांगितले. यामुळे तिला पुन्हा पवित्र करुन घेण्यासाठी तिचे केस कापण्यास सांगण्यात आले. याचबरोबर, या समाजाच्या सभासदांसाठी पालकांना मेजवानीही द्यावी लागली,'' असे येथील पोलिस अधीक्षक लाल उमेद सिंग यांनी सांगितले.
या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
[आपण समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जात आहोत. पोलीस कार्यवाही करुन समाजातील त्या लोकांना चोपलं पाहिजे. - प्रा.डॉ.]
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 12:15 pm | प्रचेतस
भोर (पुणे) : टिटेघर (ता.भोर) येथील महिलांनी हाताने बनविलेल्या गोधड्यांना अमेरीकेत स्थायिक असलेल्या भारतीयांकडून मागणी होत आहे. अमेरीकेत स्थायिक असलेले अनेक भारतीय मायदेशी आल्यावर टिटेघरला भेट देऊन गोधड्या खरेदी करू लागले आहेत. याशिवाय टिटेघरमधील महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूंनाही अमेरीकेतील नागरिकांना भुरळ पडली आहे.
टिटेघर मधील महिलांची किर्ती सातासमुद्रापार पसरली असून महिलांना विविध वस्तू बनविण्यासाठी देशातील नागरिकांचे सहकार्य मिळाले तर या महिला चांगला व्यवसाय करू शकतील. मूळचे पुण्यातील असलेले परंतु सध्या अमेरीकेतील 'आयोवा' राज्यातील 'केडर-रॅपीड' शहरात स्थायीक असलेले प्रशांत परांजपे यांनी भारतात आल्यानंतर मित्र अमित जोशीसमवेत टिटेघरला भेट दिली. आणि महिलांकडून गोधड्या विकत घेतल्या. अमेरीकेतील मशीनवर बनविलेल्या गोधड्यांपेक्षा भारतातील महिलांनी बनविलेल्या
गोधड्यांमध्ये आम्हास मायेची ऊब मिळत आहे.
हाताने बनविलेल्या वस्तूंना अमेरीकेत मोठी मागणी असून टिटेघरमधील महिलांच्या गोधड्या अमेरीकेत मोठ्या प्रमाणात व चांगल्या किमतीत विकल्या जात असल्याचे परांजपे यांनी सांगितले. टिटेघरमधील ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी गोधड्या बनविण्यासाठीचे प्रशिक्षण घेतले. यासाठी भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे-चौगुले आणि तहसीलदार वर्षा शिंगन-पाटील यांनी महिलांना समुपदेशन केले आणि पुण्यातील सिटी कार्पोरेशन प्रा. लि. यांच्या वतीने महिलांना योग्य पध्दतीने गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण दिले
(दै. सकाळ)
13 Feb 2018 - 12:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बॉलिवूडची ठुमका क्वीन शिल्पा शेट्टीला विआन नावाचा मुलगा असल्याचं सर्वश्रुत आहे. मात्र अलीकडेच तिनं आपल्याला मुलगी हवी असल्याचं बोलता-बोलता कबूल केलंय. खरं तर आधीपासूनच शिल्पाला मुलगी हवी होती. त्यात 'सुपर डान्सर २'मधील एक परफॉर्मन्स बघून ती भावुक झाली आणि मनातील ही इच्छा बोलून दाखवली. लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचा हा इशारा तर नाही ना?
[समाज नावाची व्यवस्था लै वाईट असते. लोकांना फार घाई असते, काही आहे का नाही, विचारायची. सालं व्यक्तीगत आयुष्य आहे, वाटेल तसं जगू द्यावं ना -प्रा.डॉ. -]
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 12:30 pm | प्रचेतस
धन्स ह्या बातमीबद्दल, तिला विआन नामक मुलगा आहे हे मला ठाऊक नव्हतं(बातमी सर्वश्रुत असली तरी).
14 Feb 2018 - 7:54 am | एमी
छान!
13 Feb 2018 - 12:11 pm | manguu@mail.com
तीन दिवसात काठी फिरवून आर्मी तयार होते.
मग हे बाबराच्या खापरपणतूकडून तोफ उडवायची विद्या का शिकत आहेत ?
13 Feb 2018 - 6:16 pm | सुबोध खरे
मोगा खान
तुम्ही नागरिक शास्त्र वाचलं नाही हे सिद्ध करून दाखवला होतंच
आता इतिहासहि वाचला नाही हे हि सिद्ध करून दाखवतेय का?
बाबर अरब नव्हता
उझबेक होता
13 Feb 2018 - 7:07 pm | manguu@mail.com
असुद्या हो. तसे तर मोघल राजपुतांचे जावई लागतात.
मग अरब उझबेकवाल्यांचे पणतू न लागायला काय झाले ?
13 Feb 2018 - 7:29 pm | सुबोध खरे
अरब लोक इतर मुसलमानांना "कमअस्सल" समजतात. उदा ताजिक उझबेक बांगलादेशी पाकिस्तानी ई.
18 Feb 2018 - 7:54 am | manguu@mail.com
आणि भारतात स्वातंत्र्य , समता आणि बंधुता आहे का ?
सूतपुत्र ते सैराट !!
13 Feb 2018 - 11:00 am | सचिन७३८
समर्थ पर्याय आहे का?
13 Feb 2018 - 11:30 am | विशुमित
आपले एक मिपाकर आहेत त्यांचा हा बिगुल वरचा लेख वाचनीय आहे.
http://www.bigul.co.in/bigul/1514/sec/9/alternative%20for%20Modi
13 Feb 2018 - 11:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आदरणीय नरेंदरजी मोदींना पर्यायच नाही, किंवा सध्या सत्तेच्या राजकारणात समर्थ पर्यायच नाही, ही मानसिकता बनविण्याचे काम सध्याची यंत्रणा करीत आहे. लोकंही गोंधळून गेले आहेत. आपण एक चांगल्या लेखनाचा दुवा दिला. धन्स.
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 12:33 pm | सचिन७३८
संपूर्ण लेखात चर्चा फक्त मोदींवरच आहे. ह्यात १२५ वर्षांचा जाज्वल्य इतिहास असणारा पक्षही फसतो हे आश्चर्य आहे. शेवटी पक्षापेक्षा तो चालविणारा कसा आहे यावर भवितव्य अवलंबून आहे. नमो नमो.
18 Feb 2018 - 11:24 am | सुबोध खरे
तो डांगे यांचा लेख आहे . मुळातच चष्मा लावलेला आहे त्यामुळे काळा सोडून कोणताच रंग दिसणार नाही.
18 Feb 2018 - 1:32 pm | मार्मिक गोडसे
तो डांगे यांचा लेख आहे . मुळातच चष्मा लावलेला आहे
19 Feb 2018 - 2:18 pm | सुबोध खरे
लेख अगोदर वाचला आणि नंतर तो डांगेंचा आहे हे वाचले. त्यामुळे मतात काही बदल झाला नाही.
19 Feb 2018 - 2:37 pm | manguu@mail.com
बिगुल संघाचा आहे की डांगेंचा, यावरही आवडनिवड ठरते.
13 Feb 2018 - 11:37 am | सुबोध खरे
काय आहे प्रा डॉ
तुम्हाला लष्करी डावपेच समजत नाहीत तेंव्हा उगीच टेन्शन घेऊ नका
13 Feb 2018 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय आहे प्रा डॉतुम्हाला लष्करी डावपेच समजत नाहीत तेंव्हा उगीच टेन्शन घेऊ नका
खरंय...! सामान्य माणूस म्हणून आम्हाला काही लष्करी डावपेच समजत नाही, हे मान्यच आहे. पण गेली साठेक वर्ष पूर्वीची सरकारं पाकिस्तानला असेच सज्जड दम आणि इशारे द्यायचे तेव्हाही तो एक डावपेचाच भाग असायचा असं समजतो.
मला वाटलं होतं हे सरकार थेट लाहोरात धडक मारेल असं एक स्वप्नाळू मत होतं, सालं हाही डावपेचाचेच भाग होता ते आता ते समजलं. धन्स.
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 12:13 pm | सुखीमाणूस
तर युद्ध लादले म्हणुन किती आकांत करतील त्याचा विचार करा...
माझ्या मते प्रत्यक्ष युद्ध करण्यापेक्षा राजनैतिक डावपेच महत्त्वाचे आहेत.
13 Feb 2018 - 2:37 pm | विशुमित
ह्या सरकार ने आता काही ही करू देत जनता बोंबच मारणार आहेत. विश्वासार्हताच राहिली नाही आहे.
13 Feb 2018 - 2:42 pm | श्रीगुरुजी
खुलासा - जनता म्हणजे राहुल, पवार, मायावती, उठा असले अपयशी नेते आणि त्यांचे फुटकळ पक्श
13 Feb 2018 - 2:51 pm | विशुमित
जनता कोण आहे ते दिसलंय पोट निवडणुकीतील निकालांवरून.
13 Feb 2018 - 2:57 pm | श्रीगुरुजी
जातीजातींना पेटविण्याचं धोरण किती काळ यश देईल ते २०१९ ला कळेलच. तोपर्यंत पोटनिवडणुकीवरच आनंद माना.
13 Feb 2018 - 5:02 pm | manguu@mail.com
गुजरातेत हरले ... जिग्नेशने जातीयवाद पेटवला.
राजस्तानात हरले ...पद्मावतीने जातीयवाद पेटवला.
प्रत्येक राज्याला एकेक कारण आताच हुडकून ठेवा.. २०१९ ला एकदम भोकांड नको.
13 Feb 2018 - 4:55 pm | बिटाकाका
हाहाहाहा! दहापैकी ९ महानगरपालिका हरल्यावर एक महापालिका जेव्हा जिंकली तेव्हा तिथले एक नेते छाती फुगवून म्हणाले होते कि हा मोदींना आणि नोटबंदीला जनतेचा धडा आहे! त्याची आठवण झाली. :):)
13 Feb 2018 - 3:26 pm | श्रीगुरुजी
>>> मात्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी केवळ तीन लाख 25 हजार रुपये खर्च केले आहेत.
गांधीवरील पुस्तकांच्या मागील ७० वर्षात खरेदी केलेल्या कोट्यावधी प्रती असतीलच की. का दरवर्षी आधी खरेदी केलेल्या सर्व प्रती दुर्लक्शून नव्याने खरेदी करायची?
13 Feb 2018 - 3:31 pm | कपिलमुनी
पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी गांधी , मोदी वा इतर कोणत्याही राजकीय नेत्यांची चरीत्रे वाचनासाठी ठेवू नयेत. देशोदेशीच्या बालकथा , विज्ञान कथा , खेळाची पुस्तके असावीत.
13 Feb 2018 - 3:34 pm | श्रीगुरुजी
हे योग्य ठरेल.
13 Feb 2018 - 6:37 pm | अर्धवटराव
+१००
+१०० भारतातल्या सगळ्या राज्यांच्या १-२ प्रातिनीधीक कथा असाव्यात (तेनाली रामा वगैरे). मुलांना कळावं तरी कि तामिळनाडु आणि आंध्र हे वेगवेगळे आणि साहित्य संमृद्ध प्रदेश आहेत म्हणुन.
19 Feb 2018 - 12:39 pm | चिगो
'हम अपनी मुहोब्बत का नया इतिहास लिखेंगे ऽ ऽ ऽ...' हे गाणं आठवलं मला..
13 Feb 2018 - 9:54 am | श्रीगुरुजी
https://m.maharashtratimes.com/international/international-news/i-love-p...
कराची :
पाकिस्तान भेटीवर गेलेले काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. 'भारतावर माझं जेवढं प्रेम आहे, तेवढंच प्रेम पाकिस्तानवरही आहे,' असं वक्तव्य अय्यर यांनी केलं आहे. भारत आणि पाकिस्तानचे संबध सुधारायचे असेल तर दोन्ही देशांत चर्चा व्हायला पाहिजे, असं सांगतानाच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुकही केलं आहे.
_______________________
यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. खांग्रेसी पाकप्रेमी आहेत हे उघड गुपित आहे.
13 Feb 2018 - 10:37 am | विशुमित
उलट अय्येरांचे आभार मानले पाहिजेत, नाहीतर गुजरात मध्ये नाक कापले गेले असते.
13 Feb 2018 - 3:17 pm | श्रीगुरुजी
अय्यरचे आभार. जे तमाम खांग्रेसींच्या पोटात आहे, नेमकं तेच मण्याच्या ओठात येतं व त्यामुळे खांग्रेसींचा खरा चेहरा उघड होतो.
13 Feb 2018 - 3:18 pm | श्रीगुरुजी
अय्यरचे आभार. जे तमाम खांग्रेसींच्या पोटात आहे, नेमकं तेच मण्याच्या ओठात येतं व त्यामुळे खांग्रेसींचा खरा चेहरा उघड होतो.
13 Feb 2018 - 3:24 pm | कपिलमुनी
आडवाणी , यशवन्त सिन्हा , शत्रुघ्न सिन्हा यांच्या सारखेच का ??
13 Feb 2018 - 3:27 pm | श्रीगुरुजी
???
13 Feb 2018 - 11:05 am | सचिन७३८
परमशांतीचा पुरस्कार करण्याऱ्या पाकिस्तानचे प्रयत्न भारतीय सीमेवर साऱ्या जगाला दिसतंच आहेत.
13 Feb 2018 - 12:45 pm | सचिन७३८
‘भारत-पाक यांमधील चर्चेचा मार्ग क्रिकेटमधून जातो’ अशा आशयाचा लेख एका ज्वलंत धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसी मराठी दैनिकात वाचल्याचे स्मरते.
13 Feb 2018 - 11:30 am | तर्राट जोकर
बिर्याणी चोपायला जाणार्या नरेंद्रमोदीचे पाकप्रेमही जगजाहिर आहे.
13 Feb 2018 - 11:36 am | विशुमित
जीनांच्या थडग्याला माथा टेकवला त्यांना कशाला अडगळीत टाकता, त्यांचे पण उदोउदो होऊ द्यात.
आणखी एक कोण तरी कुलकर्णी होते पुस्तक प्रकाशन करून आले, त्यांनी काय तुमचं बोका मारलाय का ?
...
यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. खाजपी देखील पाकप्रेमी आहेत हे उघड गुपित आहे.
13 Feb 2018 - 12:41 pm | सुखीमाणूस
पाप हो ही..
नको तितके लाड केले आहेत एका धर्माचे फक्त ममतान्कडे बघून.
भारतात बरेच पाक्प्रेमी आहेत. ते पुरोगामी आणि समाजवादी कसली कुई घालतील.
पण खरच वाट्त एखादा तरी भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा.
जसा म्यानमारने ऱोहिन्ग्या मुसलमान लोकांना शिकवला तसा.
पण आपले अन्तर्गत विरोधक असले काही होऊच देणार नाहीत.
13 Feb 2018 - 12:45 pm | सुखीमाणूस
ममत्नाकडे हे मतान्कडे
असे वाचावे
13 Feb 2018 - 12:59 pm | सुखीमाणूस
ममत्नाकडे हे मतान्कडे
असे वाचावे
13 Feb 2018 - 2:35 pm | विशुमित
तीन दिवसात तयारी करून जायचे धडा शिकवायला नेपाळ मार्गे. हाकानाका...
14 Feb 2018 - 7:52 am | एमी
13 Feb 2018 - 12:13 pm | सुखीमाणूस
माझ्या मते प्रत्यक्ष युद्ध करण्यापेक्षा राजनैतिक डावपेच महत्त्वाचे आहेत.
आणि अर्धा तासच्या आतच
13 Feb 2018 - 12:41 pm | सुखीमाणूस
पण खरच वाट्त एखादा तरी भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा.
जसा म्यानमारने ऱोहिन्ग्या मुसलमान लोकांना शिकवला तसा.
>> :)
14 Feb 2018 - 9:32 am | सुखीमाणूस
एक दिवस नक्कीच पाकिस्तानला धडा मिळेल.
फ़क्त भारतात अजून काही वर्ष मुस्लीम प्रेमी सरकार यायला नको.
आले भाजपा आणि सुटले सगळे प्रश्न 5 वर्षात असे तर नक्कीच शक्य नाहीये.
मी स्वता भाजपा किवा मोदी यांचा जो प्रौपगन्डा चालू आहे त्याची समजून उमजून समर्थक आहे (तो जरा कमी होईल आता असे वाट्ते आहे)
आजवर सत्ताधारी लोकानी हेच केले. आम्हीच पुरोगामी व अल्प्सन्ख्यन्चे तारणहार असे म्हणत व हिन्दु उच्चवर्णियान्ची भीती घालत राज्य केले. स्वातंत्र्य फक्त आमच्या पक्षामुळे मिळाले असे ठसवत सतत मते मिळवली.
एखादा कमी कपड्यात नाचतोय आणि एखाद्याला प्रेक्शक आपल्याकडे वळवायचे आहेत तर त्याला पण तसेच नाचावे लागणार. वाट बघायची प्रेक्शकान्ची अभिरुची कधी सुधारते त्याची!!! फक्त भीती हीच की तोच बिघडत जायचा....
14 Feb 2018 - 12:20 pm | मेघपाल
तथाकथित मुस्लिमप्रेमी काँग्रेसनेच तीन तीन वेळा पाकिस्तानला धडा शिकवला आहे. कालपरवा जन्माला आलेल्या दुधपित्या बच्च्यांना मात्र ते माहित नसतं.
15 Feb 2018 - 6:00 pm | सुखीमाणूस
नक्कीच चांगल केल जेव्हा जेव्हा पाक ने युद्ध लादले तेव्हा तेव्हा चांगला धडा शिकवला. पण त्याचवेळी भारतीय मुसलमान मात्र मागास ठेवले. फक्त मतपेढी एवढाच विचार केला.
13 Feb 2018 - 11:51 am | manguu@mail.com
हायला , गंमतच आहे.. अखंड हिंदुस्तान , नथुरामचा जयजय पण करायचं आणि पाकिस्तानवर प्रेमही करायचे नाही .. !!!
गंमतच की !
अफगाणिस्तान ते मालदीव सगळ्यावर प्रेम करणारा असेल तरच तो अखंड हिंदुस्तानचा पाईक ठरेल ना ?
13 Feb 2018 - 11:56 am | कपिलमुनी
ओमानमध्ये पंप्र ची कॉंग्रेसवर टीका
सतत प्रचारकी मोड असला की असे होते. बाहेरच्या देशात जाऊन सुद्धा काँग्रेसने यंव केला त्यांव केला, याला बघितला की शाळेमधली खेळणं हरवल की ८ दिवस रडत जाणारी पोरं आठवतात.
150 वर्षांनंतर काँग्रेस आले तेव्हा ते सुद्धा एवढे रडले नव्हते.
आणि देशांतर्गत टीका करा , बाहेर जाऊन कशाला तेच दळण ??
आम्ही पंप्र चा मान राखण्या अगोदर त्यांनी स्वतः तो ठेवायला शिकला पाहिजे.
मोदीजी , तुम्ही भाजपाचे नाही देशाचे पंतप्रधान आहात.
13 Feb 2018 - 12:05 pm | विशुमित
यांनी नुसता देशाचे नाही तर भाजपचे देखील खूप नुकसान केले आहे.
(RBI अजून नोटा मोजतीय...)
13 Feb 2018 - 1:07 pm | बिटाकाका
१. तुम्ही स्वतः टाकलेली लिंक तरी नीट वाचली का?
२. त्या लिंक मधील बुलेट मध्ये कुठे काँग्रेसवर टीका केली आहे?
३. ओमान मध्ये जाऊन भारतीयांच्या मेळाव्यात पंतप्रधान आपली बाजू मांडत असतील तर भारताबाहेर वगैरे ओरडण्यात जळफळाटाशिवाय इतर काही आहे का?
४. मागच्या सरकारांनी केलेली घाण भारताच्या नागरिकांनी (मग जगात कोठेही असोत) कळू नये हि इतकी "पुरोगामी" भूमिका कशाला? काँग्रेस, सरकारमध्ये असताना भाजपाबद्दल बोलत नव्हती का? कायमस्वरूपी हिंदुत्ववादी म्हणून हिंणावताना हि पुरोगामी भूमिका कुठे गेली होती? हिंदुत्ववादी म्हणजे जणूकाही शिवी आहे अशी परिस्थिती करून स्वतःचं सरकार असताना बोंबलणारे आता त्यांच्यावर टीका केली तर का विरोध करत आहेत?
५. भाजपने आम्ही काय केले हे सांगताना मागे काय होते हे सांगितले तर एवढा जळफळाट का व्हावा?
६. मागच्या सरकारचा नाकर्तेपणा आम्हाला सांगू नका नाहीतर आम्ही मागच्या सरकारला परत आणू असली विचित्र भूमिका मांडताना स्वतःचं पितळ उघडं पडतंय हे लक्षात येत नसेल का?
७. १० पैकी एका वाक्यात काँग्रेसवर टीका केली कि पूर्ण भाषण काँग्रेसवर होतं म्हणून ओरडताना स्वतःचा दांभिकपणा उघडा पडतोय हे लक्षात येत नसेल का?
८. स्वतःला हवं तेच वाचायचं/ऐकायचं असेल तर मोदींकडे असल्या लोकांपर्यंत स्वतःचे मुद्दे पोहोचवण्याचा काय मार्ग राहतो? चितभी मेरी, पट भी मेरी!
13 Feb 2018 - 12:10 pm | प्रचेतस
पणजी - एका युवा संमेलनात युवकांशी संवाद साधताना (शुक्रवार) गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तरुणांच्या वाढत्या व्यसनाधिनेतबाबत चिंता व्यक्त केली. त्यावेळी मुलींनी देखील दारु प्यायला सुरुवात केली आहे, याची भिती वाटत असल्याचे पर्रीकर म्हणाले होते. परंतु, असे वक्तव्य करणे पर्रिकर यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर विशेष मोहिम सुरु करण्यात आली असून, #GirlsWhoDrinkBeer हा हॅशटॅग वापरुन आपला बिअरसोबतचा फोटो ट्विटरवर महिला आणि तरुणी पोस्ट करत आहेत. ''हो आम्ही बिअर पितो'' असे या मुलींनी सांगितले आहे.
ट्विटरवर या मुली पर्रिकर यांना टॅगही करत आहेत. इतकेच नाही तर अनेकींनी त्यात चिअर्स असेही लिहीले आहे. याशिवाय महिलांनो पिणे का थांबवावे? असा सवालही काहींनी व्यक्त केला आहे. पुरुषांनीही त्यांच्या या विधानाचा समाचार घेत आपला राग व्यक्त केला आहे.
(दै. सकाळ)
13 Feb 2018 - 12:18 pm | कपिलमुनी
आपल्या प्राचीन संस्कृती मध्ये महिला दारू प्यायच्या का ?
( प्रश्न राजकीय नाही , असा उल्लेख आहेत का अशी उत्सुकता आहे. पुरुष भरपूर प्यायचे हे वाचले आहे )
13 Feb 2018 - 12:37 pm | प्रचेतस
हो.
उल्लेख आहेत पण तुरळक.
रावणाच्या लंकेत हनुमान जातो तेव्हा अंत:पुरात मद्यधुंद होऊन पडलेल्या रावणाच्या कित्येक राण्यांचे दर्शन त्याला होते.
राम लक्ष्मण, सीता वनवासास जाताना सीता गंगेची प्रार्थना करताना तिला वनवास संपवून परत येताना मद्याचे सहस्त्र घट अर्पण करेन असे बोलते.
खांडवदाह प्रसंगी, तसेच चित्ररथ गंधर्वाच्या प्रसंगी कृष्णार्जुन त्यांच्या स्त्रियांसह मद्यधुंद अवस्थेत विहार करतानाचे उल्लेख आहेत.
13 Feb 2018 - 12:44 pm | विशुमित
काही ऐतिहासिक उदाहरणे ??
13 Feb 2018 - 2:03 pm | प्रचेतस
वाचनात आली नाहीत,
खुद्द शिवाजी महाराजांचा दैनंदिन आहार काय होता ह्याचेही उल्लेख कुठे मिळत नाहीत तर स्त्रीयांच्या मद्यपानाचे कुठे मिळावेत.
विजयनगरच्या परदेशी प्रवाशांच्या वर्णनात कदाचित काही उल्लेख असतील, सोमेश्वर चालुक्याच्या मानसोल्लात मद्यविषयक उल्लेख नक्कीच आहेत पण स्त्रीयांच्या मद्यपानाविषयी नाहीत. अजिंठ्याच्या भित्तीचित्रांवर मात्र राजा राणी हे दोघेही मद्यपान करतानाचे चित्र आहे उदा. विश्वंतर जातक चित्र. आणि तत्कालीन चित्रांतील, शिल्पांतील प्रसंग हे तत्कालिन समाजजीवनाचेच प्रतिक असतात असे मला वाटते.
13 Feb 2018 - 3:51 pm | जेम्स वांड
मला कायम महाराज व्हेज होते की नॉनव्हेज हा प्रश्न पडतो, आता प्रचेतस उत्तर नाही म्हणालेत म्हणजे सगळ्याच आशा मावळल्या!.
13 Feb 2018 - 12:23 pm | विशुमित
हरियाणातील स्थानिक भाजपा नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघातून किमान 1,111 बाईक्स आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हरियाणात एकूण विधानसभा 90 मतदारसंघ आहेत.
यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडून प्रदूषणाच्या मुद्द्यावरून या बाईक रॅलीवर आक्षेप घेण्यात आला होता. या रॅलीत तब्बल 1 लाख बाईक सहभागी होणार आहेत. परंतु, सध्या दिल्लीत प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी या बाईक रॅलीमुळे या प्रदूषणात आणखीनच भर पडेल. त्यामुळे या रॅलीतील मोटारसायकलींच्या संख्येवर निर्बंध घालावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यानंतर हरित लवादाकडून केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला नोटीस पाठवण्यात आली होती.
सौजन्य- दैनिक लोकमत
--------------------------------
ते प्रदूषण थोडे बाजूला ठेऊ, अशी रॅली काढून पेट्रोलच्या किमती कमी होणार आहेत का ?
http://www.lokmat.com/national/amit-shah-rally-1111-bikes-each-haryana-s...
13 Feb 2018 - 1:09 pm | बिटाकाका
रॅलीला आल्या नाहीत तर त्या गाड्या जागेवरच उभ्या राहतील का?
13 Feb 2018 - 2:31 pm | विशुमित
जागेवरच उभ्या का राहतील ?
८० प्लस च पेट्रोल टाकून फिरणारच ना.
कृपया लॉजिक समजावता का तुमच्या प्रतिसादाचे?
13 Feb 2018 - 2:53 pm | बिटाकाका
तुम्हीच तुमच्या रॅली आणि प्रदूषण संबंधाचं लॉजिक समजावा आधी.
बादवे, मध्ये एक हल्लाबोल रॅली होऊन गेली. बऱ्याच गाड्यांचा ताफा फिरत होता म्हणे. किती प्रदूषण झाले असेल देव जाणे!
13 Feb 2018 - 3:06 pm | विशुमित
मला वाटलेच होते तुमची प्रतिसाद वाचण्यात गल्लत झाली असणार.
मी लोकमत मधील बातमी दिली आहे आणि प्रदूषण होते याला माझा विशेष आक्षेप नाही आहे.
रॅली काढून पेट्रोलचे भाव कमी होणार का हा मला दैनिंदिन भेडसावणारा प्रश्न उपस्थित केला होता.
उपरोधिक प्रतिसाद होता.
....
बादवे, मध्ये एक हल्लाबोल रॅली होऊन गेली, पण टीव्ही वर आम्हाला जास्त दिसली नाही. कोणी तरी म्हणत होते इंटरनेट सेवा सुद्धा काही काळ बंद केल्या होत्या. त्यामुळे हल्लाबोल बद्दल विशेष माहिती नाही आहे.
13 Feb 2018 - 3:12 pm | श्रीगुरुजी
>>> बादवे, मध्ये एक हल्लाबोल रॅली होऊन गेली, पण टीव्ही वर आम्हाला जास्त दिसली नाही. कोणी तरी म्हणत होते इंटरनेट सेवा सुद्धा काही काळ बंद केल्या होत्या. त्यामुळे हल्लाबोल बद्दल विशेष माहिती नाही आहे.
असली काही रॅली होऊन गेली हे कळले सुद्धा नाही. यातले "कोणी तरी" म्हणजे सुळेवहिनी, नबाब मलिक, अजित पवार इ. असावेत.
14 Feb 2018 - 3:36 pm | विशुमित
उद्यापासून ऊत्तर महाराष्ट्रात चालू होतो आहे हल्लाबोल....
मागील रॅली कळली नव्हती म्हणून ही पुढील चुकू नये यासाठी माहिती.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1205146972952269&id=55278695...
14 Feb 2018 - 4:11 pm | श्रीगुरुजी
रॅलीचे मिनिटामिनिटाचे अपडेट्स टाका. आमची तेवढीच करमणूक.
मागच्या रॅलीत तोंडी तलाकला पाठिंबा जाहीर करून मुल्लामौलवींची परवानगी घेण्याचा पुरोगामी सल्ला देण्यात आला होता.
या रॅलीत बहुतेक कंजारभाट जातीतील कौमार्य चाचणी किंवा बोहरींमधील female circumcision ला उस्फूर्त पुरोगामी पाठिंबा जाहीर केला जाईल.
13 Feb 2018 - 12:40 pm | सचिन७३८
स्वयंघोषित फुरोगाम्यांना येऊन-जाऊन सारखे ‘अघोषित आणीबाणी’च्या नावाने गळे काढून फक्त रडता येते. केरळ, बंगाल येथे स्वयंसेवकांच्या होणाऱ्या हत्येबद्दल फुरोगामी नेहमीच मूकदर्शक राहतात. ‘आधी आपलं घर सुधारू मग त्यांचं’ असा आविर्भाव आणणाऱ्या फुरोगाम्यांना स्वत:च्या विचारधारेतील दोष सुधारूया असे कधीच वाटत नाही.
आता तर नवीच टूम काढली आहे. सरसंघचालकांनी स्वयंसेवकांची तुलना लष्कराशी केलेली आहे, असा खोटा आरोप करून हेच कालपर्यंत दगडफेक्यांचे समर्थन करणारे फुरोगामी आता लष्करासोबत कोरडी सहानुभूती दाखवित आहेत.
फुरोगामी जमात हा पुरोगाम्यांमधील एक वाट चुकलेला वर्ग असून ह्यांच्यामुळे पुरोगामी व फुरोगामी यांदरम्यान एक बारीक रेघ आखल्या जाऊन त्यांच्यातील फरक कळेनासा होतो.
13 Feb 2018 - 12:52 pm | विशुमित
स्वतःचा/ आपल्या सहचाऱ्यांचा जीव वाचवायला यांना येईना, हे सीमेवर देशाचे रक्षण कसे करणार ??
13 Feb 2018 - 2:55 pm | बिटाकाका
हेच लॉजिक जवानांना लावणार का तुम्ही? नाही म्हणजे पराक्रम आणि सहकाऱ्यांचे प्राण वाचवणे याच्या संबंधाचं लॉजिक समजावून सांगता का?
13 Feb 2018 - 3:24 pm | विशुमित
हे लॉजिक नाही लावणार.
ते पराक्रम गाजवून पुन्हा वचपा काढतात, स्वयंसेवकांनी कशा प्रकारे बदला घेतला ते सांगता का ?
जवान म्हणत नाहीत, आम्ही शाहिद होतो म्हणून लोकांनी आमच्यासाठी गळे काढावेत. त्यांचे ते स्वयम्भू असतात.
बायदवे केरळ मध्ये पुरोग्यम्यांबरोबर पार हत्या होई पर्यंत कसले पराक्रम करत आहेत स्वयंसेवक ?
13 Feb 2018 - 4:53 pm | बिटाकाका
त्यांनी घ्यायला पाहिजे होता अशी आपली अपेक्षा दिसते, काहींच्या काही!
संदर्भ देता का संघाने काही गळा काढला असेल त्याचे? आणि कोणाच्या शाहिद होण्यावर कोण गळे काढतंय हे दिसतंच असते अधूनमधून. लोकशाहीची हत्या, चौथ्या खांबावर हल्ला, पुरोगाम्यांवर हल्ला, मेणबत्ती मोर्चा ई. ई. ऐकले असेलच (नाही, म्हणजे ऐकायचे असेल तर). असे गळे उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या हत्यांबाबत निघताना दिसले का कधी?
ते संविधानाला धरून चालत होते! तुमची अपेक्षा आहे का कि त्यांनी त्यांच्या हत्यांचे बदल घ्यायला पाहिजे होते? पाकिस्तानचा बदला घेणे आणि देशांतर्गत हत्यांचा बदला घेणं एकाच आहे जणू आपल्या मते!
13 Feb 2018 - 5:04 pm | विशुमित
हा फरक समजला ना जवान आणि स्वयंसेवकांमधला. बस्स एवढेच मला सांगायचे होते.
बायदवे हे पुरोगामी का फुरोगामिनी मोर्चे नाही काढले तर तीन दिवसात आर्मी उभी करणाऱ्यांनी किमान तेवढे तरी करायला पाहिजे, संविधानाच्या चौकटीत राहून. नाही का ?
13 Feb 2018 - 5:12 pm | बिटाकाका
कोणता फरक? जरा नीट इस्कटून सांगता का? आणि तुम्ही म्हणता तो फरक कोणी कधी नाकारलंय हेही जरा सांगा?
त्यांनी मोर्चे काढायला पाहिजे होता का कोर्टात जाऊन केस लढ्याला हवी होती हा त्यांचा त्यांचा आणि त्य्नाच्या संघटनेचा प्रश्न आहे. इतरांचा त्याच्याशी काय संबंध? जवान म्हणत नाहीत कि आम्ही शाहिद होतो म्हणून लोकांनी आमच्यासाठी गळे काढावेत तर मग असे कोण म्हणते याबद्दल आपलं काय मत आहे?
13 Feb 2018 - 5:36 pm | विशुमित
प्रतिसाद करता म्हणतोय :
स्वयंघोषित फुरोगाम्यांना येऊन-जाऊन सारखे ‘अघोषित आणीबाणी’च्या नावाने गळे काढून फक्त रडता येते. केरळ, बंगाल येथे स्वयंसेवकांच्या होणाऱ्या हत्येबद्दल फुरोगामी नेहमीच मूकदर्शक राहतात.
तुम्ही म्हणताय :
असे गळे उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या हत्यांबाबत निघताना दिसले का कधी ?
===<<< आता इथे पुरोगाम्यांनी यांच्यासाठी का म्हणून गळे काढावेत ? जे त्यांच्या विचारसरणीचे नाही आहेत. खेद वाटत असावा. पण बोलून दाखवले नसेल. सिम्पल लॉजिक आहे.
मग याठिकाणी त्या डाव्या पुरोगाम्यांचा वचपा काढायला/बदल घायला मी कुठे म्हंटले कि बंदुका घ्या (काठ्या घ्या ). डोकी फोड. कोणत्या प्रकारे बदल घेतला हे तुम्हाला विचारले. जे काही कायदेशीर मार्ग आहे त्यानुसारच करा. आर्मी देखील संविधानाच्या चौकटीत राहूनच सीमेवर काम करत असते.
उजव्यांनी किमान मोर्चा काढून झालेला प्रकार निंदनीय आहे असे ठणकावून सांगायला पाहिजे.
मी तरी अजून मिसळपाववर कोण्या स्वयंसेवकाची हत्या झाली म्हणून श्रद्धांजलीचा धागा / प्रतिसाद टाकलेला पाहिला नाही .(माझ्या नजरेतून सुटला असेल असेल तर कृपया दाखवा)
.....
बायदवे केरळ मध्ये पुरोग्यम्यांबरोबर पार हत्या होई पर्यंत कसले पराक्रम करत आहेत स्वयंसेवक ? हे अनुत्तरीतच ठेवलेत. (खरंच मला तिथली परिस्थिती माहित नाही आहे म्हणून विचारतो आहे. गैरसमज नसावा.)
13 Feb 2018 - 6:25 pm | बिटाकाका
तुम्हाला बहुतेक मूळ मुद्दा समजलेला नसावा!
तर मला समजलेला मूळ प्रतिसादातील मुद्दा असा आहे कि पुरोगाम्यांना हे समजणे आवश्यक आहे कि जेव्हा अशा हत्या होतात तेव्हा तो एक गुन्हा असतो. उगाच लोकशाहीवर हल्ला वगैरे गळे काढायचे आणि जेव्हा अशाच हत्या जेव्हा आपल्या विचारसरणीच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या होतात तेव्हा मुकदर्शक बनायचे हा दांभिकपणा आहे. अशा हत्या जेव्हा होतात, तेव्हा लेट लॉ टेक इट्स कोर्स! कायद्याला आपलं काम करू द्या! उगाच लोकशाही आणि बाकीच्या गोष्टी करून स्वतःच्या दांभिकपणाचं प्रदर्शन कशासाठी? याउलट तुम्ही म्हणताय कि संघाने किंवा उजव्या विचारसरणीवाल्यानीही असं दांभिक प्रदर्शन करावं. हे पटत नाही. आणि हो उजव्यांनी ते केलं तरी ते दांभिक प्रदर्शनच असेल!
यात तुमच्या बादवे चं उत्तर आलं असेल अशी अपेक्षा करतो! स्वयंसेवक हत्या रोखू शकण्यासाठी काय करू शकतात? (आणि म्हणून मी म्हणालो कि पराक्रम आणि स्वतःच्या सहकार्यांना वाचवणे याचा बादरायण संबंध कशाला जोडायचा - म्हणून सैनिकांचं उदाहरण!) ते संविधानात राहतात आणि ते कायद्याला त्याचा न्यायनिवाडा करण्याबद्दल पाठपुरावा करू शकतात! माझ्यामते उजवे हेच करत आहेत केरळ मध्ये!
13 Feb 2018 - 8:56 pm | सचिन७३८
तुम्हांला नक्की फुरोगामी म्हणायचं आहे की पुरोगामी?
सर्व समान, सगळे सारखेच असा स्वघोषित दंभ मिरवणाऱ्यांनी “आपल्या विचारसरणीचे नाहीत” म्हणून इथे समान न्याय लावू नये हे जरा खटकते.
13 Feb 2018 - 5:11 pm | विशुमित
<<<संदर्भ देता का संघाने काही गळा काढला असेल त्याचे?>>>
==>> बीटाकाका काय होतंय तुम्ही मूळ प्रतिसादकर्ता काय म्हणतोय आणि त्याला दिलेल्या उप प्रतिसादात मी काय म्हणतोय हे नीट वाचताना दिसत नाही आहात.
गळे का काढले नाही असे प्रतिसादकर्ता म्हणतोय, संघ नव्हे.
वाचताना "दक्ष राहा" हि आर्जव...
13 Feb 2018 - 5:14 pm | बिटाकाका
एकदा ते आर्जव स्वतःलाही करा हो हि विनंती!
13 Feb 2018 - 5:39 pm | विशुमित
स्वतःला आर्जव केला.. पुन्हा ३-४ वेळा वाचून काढले.
13 Feb 2018 - 6:07 pm | manguu@mail.com
त्यांची आता आरम: करायची वेळ येणार आहे. २०१९ ला
५ वर्षे दक्ष नंतर धावीस वर्षे आरम:
14 Feb 2018 - 9:06 am | सुखीमाणूस
वर्षानंतर परत दक्ष का?
13 Feb 2018 - 2:14 pm | श्रीगुरुजी
खांग्रेसी लष्कराबद्दल कायमच आदरपूर्वक बोलतात.
उदा. लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा 'सडकछाप गुंड' असा खांग्रेसी संदीप दिक्शितने केलेला गौरव.
13 Feb 2018 - 6:26 pm | माहितगार
व्यक्तीलक्ष्य तर्कदोष
मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते.
मराठी विश्वकोशातील लेखक मे. पुं.रेगे ह्यांच्या मतानुसार 'विरोधकाच्या मतांचे खंडन न करता त्याच्या स्वभावावर किंवा वर्तनावर टीका करण्यात आलेली असते; विशेषतः विरोधकाचे वर्तन त्याने प्रतिपादन केलेल्या मतांविरुद्ध आहे असे दाखवून देण्यात आले असते. उदा., दारूबंदी असावी ह्या मतांवर टीका करताना दारूबंदीचे पुरस्कर्ते स्वतः दारू पीत असतात हे दाखवून देणे.
व्यक्तिगत आरोप व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ("व्यक्तिगत आरोप " अथवा "व्यक्तिगत हल्ला") सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो.
एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.
उदाहरणे
" महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते."
" तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही."
"डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?"
"तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही."
"सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"
13 Feb 2018 - 7:03 pm | सुबोध खरे
वा !
काय भाषा आहे!
अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत
13 Feb 2018 - 2:15 pm | श्रीगुरुजी
https://www.thestatesman.com/india/nitish-kumar-defends-mohan-bhagwats-r...
13 Feb 2018 - 2:16 pm | कपिलमुनी
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षाही महाराष्ट्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अधिक प्रेमात पडलं आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने मोदींवरील चार-पाच हजार नव्हे तर १.५ लाख पुस्तकांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ५९.४२ लाख रुपये मोजण्यात येणार आहेत.
हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी भाषेतील ही पुस्तके जिल्हा परिषदांच्या ग्रंथालयात ठेवण्यात येणार आहेत . चांगली पुस्तके घ्यायचे सोडून भंकस पुस्तके घेतात आणि
त्याहून वाईट हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषातील पुस्तके ?? मराठी ग्रंथालयात मराठी पुस्तके ठेवणे उचित झाले असते . पण फडणवीसांना दिल्लीकरांना खुश करायचे असेल.
असे वाचले की भाजपा हा काँग्रेसचा दुसरा चेहरा आहे हे पटते
14 Feb 2018 - 3:21 pm | मामाजी
माझ्या फेबू वर आलेला हा मेसेज.
वाचा अाणि माध्यमे केवढा गोंधळ उडवून देतात हे लक्षात येईल.
_*मोदींच्या पुस्तकांआडून विशिष्ट प्रकाशकांचा सरकारवर दबाव*_
- राजेश प्रभु साळगांवकर
मुंबई, दि. 13 फेब्रुवारी 2018 :
नरेंद्र मोदी यांच्यावरची लाखो पुस्तके घेतली असा खोटा प्रचार करत काही प्रसिद्धीमाध्यमातून येत असलेल्या बातम्यात काही तथ्य नसून काही विशीष्ट विचारसरणीचे नाराज प्रकाशक या बातम्यांच्या मागे असल्याचे कळते. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून काही विशिष्ट विचारांचे साहित्य समाजात पसरविण्याचे चाललेले "वैचारिक उद्योग" नवीन सरकार आल्यावर बंद पडल्याने हे विशिष्ट प्रकाशक सैरभैर झाले आहेत. मात्र राज्यातील प्रकाशकांच्या संघटनेने सरकारला पत्र लिहून नवीन निकष आणि प्रक्रियेबद्दल सरकारचे कौतुक केले आहे.
यापूर्वी राज्याबाहेरचे अनेक प्रकाशक आपली सुमार पुस्तके राज्य सरकारच्या गळ्यात मारत होते. शिक्षण विभागातील अतिशय उच्चपदस्थ सूत्रांच्या म्हणण्यानुसार यातील अनेक पुस्तकांची मजकूर आणि निर्मितीमुल्ये यातील गुणवत्ता अत्यंत सुमार दर्जाची होती. यासंदर्भात राज्यातील अनेक प्रकाशकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात एक समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार सप्टेंबर 2017 मध्ये काढलेल्या निविदांप्रक्रियेत सुधारणा केली गेली आणि नवीन अटींसह तीच निविदा प्रक्रिया 13 जानेवारी 2018 रोजी पुढे राबवली गेली. त्यामुळे राज्याबाहेरचे अनेक प्रकाशक या प्रक्रियेतून बाहेर गेले. त्यांनी सादर केलेली पुस्तके दर्जा आणि शैक्षणिक मूल्ये या दोन्ही निकषांवर नाकारण्यात आली. त्यातील अनेक पुस्तके मूळ कुठल्या पुस्तकावरून तयार (भाषांतरित / आधारित) केली आहेत किंवा ती पूर्णतः नवीन सृजन आहे, हे ही कळत नव्हते. त्यातील विषयांचे नीट आकलनही होत नव्हते. तर अनेक पुस्तके ही एक विशिष्ट विचारसरणी प्रसारित करण्यासाठीच आहेत असे वाटावे, अशी स्थिती होती.
यापूर्वी राज्यातील केवळ वीस प्रकाशक राज्य सरकारला ही अवांतर वाचनाची पुस्तके पुरवीत होते. आणि बहुसंख्य प्रकाशक हे राज्याबाहेरचे होते. मात्र आता राज्याबाहेरचे प्रकाशक नाहीत. राज्यातील प्रकाशकांचे संख्या चाळीसने वाढली आहे. निवड समितीने निवडलेली पुस्तके विषयाची मांडणी, वैचारिक दर्जा आणि निर्मिती मूल्ये या निकषांवर उत्कृष्ट आहेत, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
शिक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार मोदींवरची लाखो नव्हे तर केवळ 69 हजार पुस्तके खरेदी करण्यात अली आहेत. तर त्याच जोडीला छ.शिवाजी महाराजांवरची साडेचार लाख पुस्तके, अब्दुल कलाम यांच्यावरची अडीच लाख पुस्तके आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर आणि म.फुले यांच्यावरची 2 लाख पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत.
-----------------------
*एका विशिष्ट विचारांचा प्रसार*
एका विशिष्ट विचारसरणीचा प्रसार मागील सरकार कसे करत होते याचे उदाहरण सांगताना शिक्षण विभागातील एक उच्च पदस्थ अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले की पुण्यातील एका समाजवादी साप्ताहिकाच्या दीड लाख प्रती प्रत्येकी 40 रुपये या दराने पूर्वीचे सरकार घेत होते. (बाजारात ते साप्ताहित 15 ते 20 रु.च्या दरम्यान विकले जाते !) त्यातील विचारसरणी, त्यातील आराजकवादी आणि समाजाच्या श्रद्धा दुखवणारी तिखट भाषा याबद्दल तक्रारी प्राप्त होऊनही आधीच्या सरकारने हे पाक्षिक सरकारी खर्चाने शाळांना पाठवणे सुरू ठेवले होते. तावडेंकडे याविषयातील तक्रारी गेल्यावर तावडेंनी या साप्ताहिकाचे काही अंक पाहून ते नियतकालिक शाळांना न पाठविण्याचा निर्णय घेतला. सरकारी खर्चाने शाळांना जाणारी पुस्तके व नियतकालिके यातून राजकीय विचार नव्हे तर शैक्षणिक संस्कार आणि सकारात्मक विचार पोहोचले पाहिजेत हा तावडेंचा आग्रह आहे, असे या उच्च पदस्थाने सांगितले. त्यामुळे आजवर या सरकारी योजनांवर जगणाऱ्या ज्या विशिष्ट विचारसरणीच्या प्रकाशकांचे आणि राजकीय विचाराधारांचे नुकसान झाले आहे, त्यांनी काही माध्यमांना हाताशी धरून या विषयात गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा थेट आरोपही या उच्च अधिकाऱ्याने केला.
14 Feb 2018 - 6:11 pm | कपिलमुनी
येथे फेबू व्हॉट्स अप चे संदर्भ फाट्यावर मारण्यात येतात
14 Feb 2018 - 6:35 pm | मामाजी
आपल्या मोदींवरील दीड लाख पुस्तकांची खरेदी या धाग्याचा संदर्भ कोणता?
13 Feb 2018 - 2:26 pm | कपिलमुनी
झोपेत घोरणे हे इतरांना त्रासदायक आणि नकोसं वाटतं. मुंबईहून सुटलेल्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांनाही असाच वाईट अनुभव आला. त्यांनी जोरजोरानं घोरणाऱ्या आणि सगळ्यांची झोप उडवणाऱ्या एका प्रवाशाला अजब 'शिक्षा' दिली. त्यांनी घोरणाऱ्या प्रवाशासोबत वाद घातला. सहप्रवाशांचा रुद्रावतार पाहून या प्रवाशाला प्रवासादरम्यान जागं राहावं लागलं.
13 Feb 2018 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपली काय मतं असतील ती मतं मांडू द्या, फक्त व्यक्तिगत न होता.
बाकी चालू द्या...!!! :)
-दिलीप बिरुटे
13 Feb 2018 - 7:52 pm | तर्राट जोकर
डॉक्टर , बघा कसे निट झाले आहे आता.
श्रीगुर्जीचा प्रतिसाद त्याखाली माहितगारचा प्रतिसाद त्याखाली सुबोध खरे... परफेक्ट फिट. हेच हवे होते. ते तसेच आले आहे.
=)) =))
13 Feb 2018 - 8:11 pm | माहितगार
!
13 Feb 2018 - 8:22 pm | सुबोध खरे
श्रीगुर्जीचा प्रतिसाद त्याखाली माहितगारचा प्रतिसाद त्याखाली सुबोध खरे
अरे वा
माझं नाव नीट लिहिता आलं तर.
पण भाषा अजूनही सभ्य आणि सुसंस्कृतच आहे
13 Feb 2018 - 8:37 pm | तर्राट जोकर
ब्वॉर्र... बसा कुढत. =))
13 Feb 2018 - 8:50 pm | सुबोध खरे
=))
14 Feb 2018 - 4:07 pm | मराठी_माणूस
https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/TimesOfIndia/#
रोड रेज ची एक दुर्दैवी घटना. क्षुल्लक कारणावरुन एकाचा जीव गेला. टाइम्स ने फ्रंट पानावर ही बातमी देउन तीचे महत्व अधोरेखीत केले आहे.
त्याच बातमीत, पुर्वी घडलेल्या अशा घटनाही संक्षीप्त स्वरुपात दिल्या आहेत.
आपला समाज हिंसक होत चालला आहे का ?
त्याच पानावर दुसरी घटना . मदत केल्याचे बक्षीस (?)
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/grp-scolds-man-who-saved...
14 Feb 2018 - 5:19 pm | प्रचेतस
चैन्नई
दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात एकीकडे व्हॅलेंटाइन्स डे जोरात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रेमदिवसाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. या विरोधाच्या प्रदर्शनार्थच अनेक ठिकाणी प्रेमी युगुलांना पळवून लावले जात आहे तर काही ठिकाणी प्रेमाचे पोस्टर्स फाडले जात आहेत. तामिळनाडूची राजधानी चैन्नईत मात्र एका विचित्र पद्धतीने व्हँलेंटाइन्स डेला विरोध करण्यात आला.
व्हॅलेंटाइन्स डेला विरोध करताना चैन्नईतील छुलई भागात भारत हिंदू फ्रंट मोर्चाच्या सदस्यांनी एका कुत्र्याचे लग्न गाढवासोबत लावून दिले. त्यावेळी त्यांनी कुत्रा आणि गाढवाच्या गळ्यात फुलांचे हार घातले. त्यांच्या डोक्याला हळद कुंकू लावले. व्हॅलेंटाइन्स डे विरोधात त्यांनी घोषणाही दिल्या. नंतर निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान दुसरीकडे गुजरातमध्ये साबरमती रिव्हरफ्रंटमध्ये बजरंग दलाच्या सदस्यांनी काही प्रेमी युगुलांना मारपीट केल्याची घटनाही समोर आल्या आहेत. इथेही पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
(दै. मटा)
15 Feb 2018 - 11:31 pm | जेम्स वांड
:)) :))
14 Feb 2018 - 6:27 pm | manguu@mail.com
A video, claiming to show Crown Prince of Abu Dhabi Mohamed bin Zayed al Nahyan chanting 'Jay Siya Ram' during Indian Prime Minister Narendra Modi's visit to Abu Dhabi, was shared by mainstream Indian media houses, ahead of the PM's visit. The video, as has later been turned out, is fake, and more than a year old.
The video, shared by mainstream channel Times Now and Zee News ahead of Modi's visit to the UAE claimed that Shaikh Mohammad Bin Zayed had chanted “Jai Siya Ram” while addressing a Hindu spiritual programme. A report by the Gulf News busted the fake news with true facts.
https://www.outlookindia.com/website/story/indian-news-channels-run-fake...
14 Feb 2018 - 6:53 pm | प्रसाद_१९८२
14 Feb 2018 - 9:40 pm | manguu@mail.com
https://timesofindia.indiatimes.com/india/after-stopping-haj-subsidy-bjp...
मुसलमानांची हज बंद करणारे भाजपा सरकार ख्रिश्चनांसाठी जेरुसलेमची यात्रा सुरु करणार !
भक्तलोक गप्प कसे ?
14 Feb 2018 - 9:50 pm | श्रिपाद पणशिकर
14 Feb 2018 - 9:51 pm | श्रिपाद पणशिकर
14 Feb 2018 - 9:53 pm | श्रिपाद पणशिकर
14 Feb 2018 - 9:53 pm | श्रिपाद पणशिकर
The website encountered an unexpected error. Please try again later.
14 Feb 2018 - 10:25 pm | manguu@mail.com
इंग्लिश कळत नाय तर मराठीत सांगू का ?
......
महिन्याभरापूर्वी हज अनुदान बंद करणाऱ्या भाजपनं नागालँडमध्ये सत्ता आणण्याकरिता येथील ख्रिश्चन मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आकर्षक घोषणा करायला सुरुवात केली आहे. सत्तेत आल्यास ख्रिश्चनांना पवित्रभूमी असलेल्या 'जेरूसलेम'ची मोफत वारी घडवून आणण्याचं आश्वासन भाजपनं दिलं आहे. मात्र देशातील सर्वच ख्रिश्चनांसाठी हे आश्वासन आहे की केवळ उत्तर-पूर्वेतील राज्यांपूरतं ते मर्यादित आहे, याबाबतचं कोणतंही स्पष्टीकरण भाजपनं दिलेलं नाही.
https://m.maharashtratimes.com/india-news/north-east-elections-bjp-offer...
16 Feb 2018 - 7:07 am | सुखीमाणूस
भाजपा ने असे का केले असावे.
कारण भाजपला मते तर हवी आहेत.
बर ह्या सीमेवरच्या राज्यात हिन्दु संख्या कमी होऊन तो भाग
ख्रिश्चनबहुल होण्यामागे आजवर ची चुकीची धोरणे कारण नाहीत का?
बहुमतात निवडून आल्याशिवाय चांगले बदल करणे शक्य आहे का?
साध तीन तलाकचे प्रकरण राज्य सभेत बहुमताशिवाय लटकल.
मुस्लिम महिलांना निदान दुसरा तरी न्याय मिळावा म्हणुन भाजपा सरकारने हज यात्रेची रक्कम मुस्लीम महिलांच्या शिक्षणासाठी वळवली.
भाजपा काय आणि कौन्ग्रेस्स काय मतासाठी सगळेच वाट्टेल ते करतात. पण कौन्ग्रेस्स च्या राजकारणामुळे देश ही संकल्पना धोक्यात येण्याची वेळ येते आहे.
भाजपा ला स्पष्ट बहुमत मिळून समान कायदे होण्याची शक्यता आहे.
16 Feb 2018 - 7:21 am | manguu@mail.com
जेरुसलेम जायला विमान दिले की ख्रिस्चन लोक मत देतात !
हे लॉजिक अजबच आहे.
पण आसिंधुच्या पलीकडच्या पुण्यभूला भाजपा इतके महत्व देत आहे , हे पाहून 'त्याना' स्वर्गात काय वाटत असेल ? हेची फळ का ?
16 Feb 2018 - 7:35 am | manguu@mail.com
गोव्यात गाय खायला परवानगी दिली की ख्रिस्चन मत देतात !
पूर्व राज्यात जेरुसलेमला विमान दिले की ख्रिस्चन मते देतात !
...
भाजपाभक्त : झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची !!
14 Feb 2018 - 9:54 pm | श्रिपाद पणशिकर
14 Feb 2018 - 9:54 pm | श्रिपाद पणशिकर
14 Feb 2018 - 10:54 pm | श्रीगुरुजी
दिल्लीतील केजरीवाल सरकारची ३ वर्षे आज पूर्ण झाली. त्यानिमित्ताने एबीपी वृत्तसंस्थेने केलेल्या मतचाचणीनुसार आज दिल्लीत निवडणुक झाली तर वरीलप्रमाणे परिस्थिती असेल. आआपची लाट कमी झाली असली तरी अजूनही आआपला सहज बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपची स्थिती ब-यापैकी सुधारेल, तर कॉंग्रेस अजूनही गाळातून बाहेर पडलेली नाही.
लोकसभेसाठी चित्र पूर्ण वेगळे आहे. आज लोकसभा निवडणुक झाली तर भाजप पुन्हा एकदा सर्व ७ जागांवर विजयी होईल. परंतु ३ जागांवर भाजपला चुरशीची लढत द्यावी लागेल.
https://www.google.co.in/amp/abpnews.abplive.in/india-news/delhi-legisla...
14 Feb 2018 - 11:57 pm | मार्मिक गोडसे
दिल व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन हो गया l
https://youtu.be/0oMOw59mNWk
15 Feb 2018 - 3:00 am | गामा पैलवान
manguu@mail.com,
हाहाहा! बाबराच्या खापरपणतूचं वय काय असेल हो? तुमचा अंदाज काय आहे? तो आजवर जिवंत राहील काय? तुमच्या डॉक्टरकीत शिक(व)लेल्या माहितीच्या आधारे उत्तर द्या बरं!
आ.न.,
-गा.पै.
15 Feb 2018 - 11:49 am | manguu@mail.com
https://www.google.co.in/amp/s/m.hindustantimes.com/mumbai-news/maharash...
खरं हाय का ?
सीसीटीव्ही घोटाळा.
15 Feb 2018 - 12:02 pm | सतिश गावडे
ओ मोंगो डीबी, ते प्रतिसादाच्या शिर्षकात काही लिहीत जा की. तुमच्या त्या टिंब टिंब शिर्षकामुळे तुमचा नवीन प्रतिसाद मोबाईलवरुन उघडायला अवघड जाते.
15 Feb 2018 - 1:12 pm | manguu@mail.com
ओके नोटेड