मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन.
https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gautam...
मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन.
https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gautam...
प्रतिक्रिया
21 Sep 2021 - 5:18 pm | कंजूस
किती प्रमाणात ?
21 Sep 2021 - 8:35 pm | गॉडजिला
माणुस दुख्ख गिळुन जगु शकतो पण सुख पचवणे सामन्यांचे काम नाही. अर्थात उपयोगी नक्किच आहे पण… जिथे मॉर्फिन झेपत नाही तिथे हेरॉइन…? शाहाण्या माणसाने दुर राहिलेलेच बरे नाही का ?
* = डॉक्टरला विचारा… हेरॉइन नाही पण मॉर्फिनवर तर ते नक्कि सल्ला देतिल.
22 Sep 2021 - 10:01 am | सुबोध खरे
मॉर्फीन पासून हेरॉईन( डाय एसेटील मॉर्फीन) तयार करणे हि अगदीच साधी प्रक्रिया आहे. मॉर्फीन ऍसेटीक ऍन हायड्राईड बरोबर उकळले कि हेरॉईन तयार होते.
दोन्हीची वेदनाशामक क्षमता समकक्ष मात्रेत (equivalent doses) एकच आहे परंतु हेरॉईनचा परिणाम लवकर कमी होतो आणि त्याची व्यसनक्षमता ( addiction potential) हे मॉर्फीन पेक्षा किती तरी जास्त आहे.
त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात हेरॉईन चा वापर केला जात नाही.
उलट एखाद्या व्यक्तीला व्यसन लावून त्याला आपला कायमचा ग्राहक करणे हे हेरोइनसाठी जास्त सोपे असल्यामुळे आणि त्याचा परिणाम लवकर उतरत असल्यामुळे ( जास्त वेळेस घ्यावे लागते) अमली पदार्थाच्या व्यापारात गुंतलेल्या लोकांना हेरॉईन हे जास्त सोयीचे पडते.
24 Sep 2021 - 6:44 pm | गॉडजिला
पण नेमकं घ्यायचं किती.
24 Sep 2021 - 7:25 pm | सुबोध खरे
घेऊन पहा. डोस जास्त झाला तर एकदम विमानाचे हवेतून थेट स्वर्गारोहणही होईल.
हा का ना का
जुन्या व्यसनी माणसांचे व्यसन सोडल्यानंतर परत "टर्की" झाल्यास( परत अमली पदार्थ घेतल्यास असे होते.
कारण शरीराची सवय मोडलेली असते आणि जुनाच डोस घेतल्यास ओव्हर डोस होऊन श्वसन बंद होऊन मृत्यू होतो.
24 Sep 2021 - 9:04 pm | गॉडजिला
मूळ प्रश्नाला तुमची बगल आहेच...
हरकत नाही.
21 Sep 2021 - 7:05 pm | hrkorde
Narcotics Control Bureau ला जुलै २०१९ पासून पूर्ण वेळ मुख्य नाही. आहे ती ऊर्जा सिनेनटांच्या मागे खर्च करताहेत.
21 Sep 2021 - 7:20 pm | सुबोध खरे
ती ऊर्जा सिनेनटांच्या मागेनसून बॉलिवूड मधील अमली पदार्थांचे आणि हवाला दलालांचे जाळे उध्वस्त करणे हे आहे.
बाकी अर्धवट माहितीवर तुमची पच पच चालू द्या
21 Sep 2021 - 7:40 pm | hrkorde
सिनेनट हे तर एन्ड युजर्स आहेत.
सगळे मादक द्रव्य हिमाचल प्रदेशात उगवते , तिथेच पकडायचे की
21 Sep 2021 - 8:08 pm | सुबोध खरे
हायला
तालिबानी आणि इतर स्मग्लर लोक यडपटच दिसतात.
एवढं लफडं करून एवढी अफू अफगाणिस्तानातून इराण मध्ये नेऊन तेथून मुंद्रा सारख्या आडवळणी बंदरात घेऊन जायला.
According to Iran's Anti-Narcotics Law, possession of narcotics is a felony punishable by death or life imprisonment if: The person is found in possession of over 30 grams (1.1 ounce) of heroin, morphine, cocaine, LSD, methamphetamine, or similar drugs.
हिमाचल प्रदेशात जायचं ट्रक मध्ये भरायचं वर सफरचंद भरायची आणि खात खात मजेत घेऊन यायचं.
हा का ना का
अमली पदार्थ वाले तर बॉलिवूड मध्ये काही ग्राम शोधत फिरतात म्हणे
-संपादित-
21 Sep 2021 - 8:10 pm | सुबोध खरे
https://www.hindustantimes.com/mumbai-news/duo-who-sold-cocaine-to-bolly...
Shaikh was arrested by the Narcotics Control Bureau (NCB) while he was selling 1 gram of cocaine to Khan outside an ATM on Juhu-Tara Road.
21 Sep 2021 - 8:19 pm | hrkorde
http://www.firstpost.com/india/himachal-pradesh-narcotics-malana-village...
21 Sep 2021 - 7:27 pm | सुबोध खरे
मोगा खान
२१ हजार कोटी मध्ये अख्खे बॉलिवूड विकत घेता येईल
https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/heroin-seized-at-mund...
21 Sep 2021 - 8:16 pm | hrkorde
सोमय्यांनी गेल्या 10 वर्षात आरोप केलेल्या व्यक्ती
कृपा शंकर
भुजबळ
अजित पवार
बबनराव पाचपुते
राणे परिवार
गावित परिवार
आज ह्यातले बहुतांश भाजपात तरी आहेत , भाजपाचे मित्र तरी आहेत किंवा बाइज्जत बरी आहेत.
21 Sep 2021 - 9:35 pm | Rajesh188
त्या मधील किती लोकांना फाशी किंवा मरे पर्यंत जन्मठेप झाली.
22 Sep 2021 - 12:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
किरीट सोमैय्या ह्यानी राणेंवर ३०० कोटी रुपयाच्या मनी लॉंडरिंगचा आरोप केला होता. तरीही राणेंना भाजपात घेण्यात आले. ह्याचा अर्थ सोमैय्या नेहमी खोटे बोलतात किंवा सोमैय्याना पक्षात किंमत नाही.
https://www.hindustantimes.com/mumbai-news/i-won-t-join-bjp-or-quit-cong...
22 Sep 2021 - 12:43 pm | श्रीगुरुजी
फडणवीसांनी सुद्धा विधानसभेत राणेंच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची यादी वाचली होती.
परंतु नंतर फडणवीसांच्या आग्रहामुळेच राणे कुटुंबियांना भाजपत घेतले, राज्यसभेची व विधानसभेची उमेदवारी दिली आणि नंतर केंद्रात मंत्री सुद्धा केले. सोमैय्या खोटे बोलत नाहीत व त्यांना पक्षात किंमत नाही असे नाही. सध्या मोदी-शहांवर फडणवीसांचा प्रभाव असल्याने इतर सर्व गौण आहेत.
22 Sep 2021 - 1:30 pm | Rajesh188
खोटे बोलत नाहीत selective बोलतात.त्यांना जेवढे बोलायला सांगितले आहे तेवढेच बोलतात.
१०५ असून सुद्धा सत्ता न मिळाल्या मुळे पक्ष नैराश्यात आहे.
त्या मुळे कधी कंगना,कधी अर्णव,कधी राम कदम,कधी फडणवीस, कधी चंपा हे सरकार वर आरोप करत असतात.
पण ह्या दोन वर्षात एक पण जनतेचा प्रश्न bjp नी विधान सभेत मांडला नाही ना त्या विषयी भाष्य केले आहे.
भ्रष्टाचार विषयी सोमय्या ना काही देणे घेणे नाही तो तर त्यांच्या पक्षातील लोक पण दणकून करत आहेत.
पण त्या वर हे कधीच बोलणार नाहीत.जनतेच्या समस्येवर bjp कधीच बोलणार नाही.
रोजगार वर,भाव वाढीवर,कधीच बोलणार नाही.
22 Sep 2021 - 7:26 pm | hrkorde
नवी दिल्ली : वाढत्या मध्यमवर्गासह त्यांच्या वाढत्या विवेकाधीन खर्चामुळे भारत २०५० पर्यंत जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार देश बनेल. जागतिक आयातीत ५.९ टक्के वाटा असलेला भारत चीन आणि अमेरिकेच्या मागे असेल. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सध्याच्या अनुमानित रँकिंगनुसार, भारत २.८ टक्के आयात वाट्यासह सर्वात मोठ्या आयातदार देशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे आणि २०३० पर्यंत चौथा सर्वात मोठा आयातदार बनणार आहे, असे एका नवीन अहवालात म्हटले आहे.
===========
https://maharashtratimes.com/business/business-news/india-will-be-third-...
===========
काही समजले नाही.
आयात जास्त म्हणजे चलन जास्त बाहेर जाणार आणि जास्त कचरा आय येणार ना ? मग त्या कर्मफलवादाचे काय होणार ?
गल्फ असेल , मालदीव असेल , हे लोक अन्नधान्यही आयात करतात , कारण त्यांची मजबुरी आहे, तिथे काही पिकतच नाही.
पण भारताला दिवसेंदिवस आयात वाढवायची काय आवश्यकता आहे ?
22 Sep 2021 - 7:27 pm | hrkorde
..
22 Sep 2021 - 8:33 pm | सुबोध खरे
जागतिक आयातीत ५.९ टक्के वाटा असलेला भारत चीन आणि अमेरिकेच्या मागे असेल.
China exported $2.49 trillion in goods while it imported $2.13 trillion.
निर्यात करण्यासाठी कच्चा माल हा आयात करावा लागत असेल तर आयात पण वाढणारच ना?
भारत लस निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे त्याबरोबरच लशी साठी कच्चा माल पण तेवढा जास्त आयात करावा लागणारच ना?
केवळ टीका करण्यासाठी एकतर्फी मांडणी आणि कोणत्याही गोष्टीचा अर्धवट अर्थ लावणे सोडून द्या
23 Sep 2021 - 10:15 am | hrkorde
म्हणजे इतकी सगळी आयात लशीसाठी असते की काय ?
23 Sep 2021 - 11:46 am | सुबोध खरे
लस निर्यात त्याबरोबरच लशी साठी कच्चा माल पण तेवढा जास्त आयात करावा लागणारच ना?
डोक्यात शिरतंय का?
23 Sep 2021 - 3:04 pm | Rajesh188
स्मार्ट सिटी निर्माण करणार होते काय झाले त्याचे झाल्या का देशात स्मार्ट city. अजुन तरी मुंबई सहित दोनतीन शहर व्यतिरिक्त काहीच दिसत नाही स्मार्ट झालेले.
चीन वर मोठी आगपाखड केली होती.
चीन कडून माल येणे बंद झाले का.
स्वदेशी चा नारा दिला होता किती स्वदेशी
प्रोडक्ट जगात धुमाकूळ माजवत आहेत.
उलट इथे खूप वस्तू चा तुटवडा असल्या मुळे बाकी देशाकडून आयात च करावे लागत आहे ते पण पहिल्या पेक्षा जास्त.
महागाई विषयी बोलायला च नको.
चुली परत पेटवायची वेळ आली आहे.
23 Sep 2021 - 7:45 pm | सुबोध खरे
पेटवा पेटवा
चूलीवरचं मटण आम्हाला फार आवडतं.
23 Sep 2021 - 10:20 am | hrkorde
According to market and consumer data firm Statista, the top 10 commodities imported by India in 2020-21 were:
Crude petroleum (21.6%)
Gold (5.9%)
Petroleum products (5.8%)
Coal, coke and briquettes (4.7%)
Pearl, precious and semi-precious stones (4.7%)
Electronic components (3.4%)
Telecom instruments (3%)
Organic chemicals (2.5%)
Industrial machinery (2.5%)
Electric machinery and equipment (2.3%)
त्यातच पुढे हेही आहे
India’s top 10 trade partners from where it imported the above commodities in 2020-21, according to Statista, were:
China (13.7%)
United States of America (7.5%)
United Arab Emirates (6.3%)
Saudi Arabia (5.6%)
Iraq (5%)
Hong Kong (3.5%)
Switzerland (3.5%)
South Korea (3.3%)
Indonesia (3.1%)
Singapore (3.1%)
Note: The percentage figures in brackets signify the foreign trade partner’s share in India’s total imports.
China takes the lion’s share
https://www.cogoport.com/blogs/top-10-india-imports-and-import-sources
23 Sep 2021 - 11:48 am | सुबोध खरे
बरं मग?
23 Sep 2021 - 12:03 pm | रावसाहेब चिंगभूतकर
आयात चुकीची असते, न आयात करणारे शूरवीर असतात, कर्ज घ्यायचं म्हणजे चूक, deficit budget वाईट असतं अशा प्रकारच्या negative IQ मुळे किंवा ड्रग्ज घेतल्यामुळे निर्माण होणारी कल्पनाशक्ती असणारे भारतात बरेच आहेत. अशांना उत्तर दिलं की ते चेकाळतात. त्या पेक्षा ignore करावं.
23 Sep 2021 - 4:44 pm | प्रदीप
१०० % सहमत.
23 Sep 2021 - 3:26 pm | Rajesh188
मध्यम वर्गीय आणि उच्च madhyam वर्गीय लोकांच्या बदलेल्या सवयी मुळे देशा ची आयात वाढली आहे.
प्रगत युरोपियन देशातील लोक सामाजिक मूल्य ,आहार ,विहार पाळत आहेत .
पण भारतातील ज्यांना शिक्षित समजले जाते तो मध्यम आर्थिक वर्गा नी त्यांचे जीवनमान असे बदलेल आहे की
त्याला तोड नाही.(आंधळे ,ज्यांना सरकार पण नीट निवडता येत नाही)
त्या मुळे गरज नसलेल्या फालतू सामानाची आयात वाढली आहे.
23 Sep 2021 - 4:28 pm | गॉडजिला
भारतातील लोक जास्तं अन्न खाऊ लागले आहेत म्हणूनच जगात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे - जॉर्ज बुश ज्युनिअर
23 Sep 2021 - 7:49 pm | सुबोध खरे
आंधळे ,ज्यांना सरकार पण नीट निवडता येत नाही
आपला पगार किती? आपली लायकी किती? हे न पाहता
आपण महापालिकेत उंदीर मारायच्या विभागात असलो तरी ठोकून द्यायचं
हा का ना का
८० कोटी मतदारापैकी पन्नास कोटी मतदारानी निवडून दिला आहे सरकारला.
आपण कोण आहोत याचा "ज~ रा~ सा" तरी विचार करत जा कि राव
22 Sep 2021 - 8:22 pm | Rajesh188
मार्केटिंग चे बळी आहेत भारतीय .तीस वर्षापूर्वी भारतीय लोकांची असलेली मानसिकता,राहणीमान आंनी आताची ह्याचा थोडा जरी विचार केला तर लक्षात येईल.
भारतीय लोकांची मानसिकता,राहणीमान ,खाद्य संस्कृती%पेहराव ह्या मध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.. खाण्या पिण्याच्या सवयी पण बदलल्या नाहीत .
त्या मुळे आयार तर वाढणारच च .
सर्व परदेशी कंपन्यांना जसा समाज हवा तसा भारतात आहे.
जाहिरात बघून fair and lovely घेणार आणि गोरे होण्याची वाट बघत बसणारा.
सर्व चांगल्या सवयी सोडून सर्व वाईट सवयी भारतीय लोकांनी खूप लवकर आत्मसात केल्या आहेत.
22 Sep 2021 - 10:37 pm | रावसाहेब चिंगभूतकर
आयात काय असते, निर्यात काय असते, अर्थव्यवस्था कशी चालते, समाज एखादि गोष्ट का करतो इत्यादी गोष्टींबद्दल ढिम्म माहिती नसताना बालिश आणि गावंढळ अर्ग्युमेंट्स करून प्रत्येक गोष्टीवर टीका करणारी एक नवीन जमात गेल्या काहि वर्षांत उदयाला आली आहे. फार फार तर एखाद्या फोटोग्राफर* चे क्वालिफिकेशन असणारे लोक कॉम्प्लिकेटेड आणि interdependent गोष्टींवर बथ्थड पणे बोलून आपले अज्ञान पाजळतात तेव्हा हसू न येता कीव येते. Meeks will inherit the earth हे खरंच आहे की काय?
* एका विशिष्ट व्यक्तीवर किंवा कामावर ही टीका नव्हे याची कृपया नोंद घ्यावी.
22 Sep 2021 - 11:48 pm | राघव
म्हणजे या सगळ्यांना राहुल गांधींनी KT दिलीये असं तुम्हाला म्हणायचं आहे काय? ;-)
23 Sep 2021 - 12:04 pm | रावसाहेब चिंगभूतकर
काही KT न घेता डायरेक्ट एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत.
23 Sep 2021 - 1:10 pm | सुबोध खरे
Heroin worth ₹879 crore seized at JNPT,Jawaharlal Nehru Port Trust ( 1 held
याला काय म्हणणार?
पंडित नेहरूंच्या बंदरात त्यांच्या वंशजांनी अमली पदार्थ आयात केले का?
काय राव ? काहींच्या काही म्हणजे किती?
23 Sep 2021 - 2:30 pm | वामन देशमुख
23 Sep 2021 - 9:35 pm | कॉमी
त्यांचे वंशज ???
23 Sep 2021 - 2:59 pm | गामा पैलवान
लोकहो,
मुंदडा बंदरात बरंच हेरॉईन सापडलं. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर हेरॉईन पकडलं जाणं यापूर्वी फार कमी वेळा घडलंय. इथला संदर्भ घेतो : https://moneyinc.com/the-20-largest-drugs-seizures-in-world-history/
इथे हेरॉईनचा तिसरा क्रमांक आहे व तो फक्त ४८० किलोचा (१०५९ पाऊंड ) आहे. म्हणजे अर्धा टन देखील नाही. मुंदडामधलं ३ टन ही जगातली आजपावेतो सर्वात मोठी हेरॉईनची धरपकड असू शकते.
माझ्या मते हे हेरॉईन भारतात विकण्यासाठी नसून त्याचं गन्तव्यस्थान अतिपूर्वेस असावं. इतक्या मोठ्या उलाढाली स्थानिक बाजारात होत नसतात. हा बोजा ( शिपमेंट ) पकडली जाणं हा त्याच्या मालकांना फार मोठा धक्का आहे.
थँक यू, मोदी!
-गा.पै.
23 Sep 2021 - 3:13 pm | Rajesh188
ज्या प्रामाणिक ,देश प्रेमी अधिकारी असलेल्या व्यक्ती नी हे ड्रग पकडले आहे .
त्या अधिकाऱ्याला सरकार काय इनाम देत आहे ह्याची update media ni लोकांना द्यावी.
पुढील दहा वर्ष.नाही तर बिचारा बडतर्फ होवून त्याच्या वर च कोर्टात केस ठोकल्या जायच्या.
23 Sep 2021 - 7:55 pm | सुबोध खरे
ज्या प्रामाणिक ,देश प्रेमी अधिकारी असलेल्या व्यक्ती नी हे ड्रग पकडले आहे .
त्या अधिकाऱ्याला सरकार काय इनाम देत आहे ह्याची update media ni लोकांना द्यावी.
ज्या शूर वीर सैनिकांनी १९७१ मध्ये पाकिस्तानला हरवून बांगला देशाला स्वातंत्र्य दिलं
त्या सैनिकांना अधिकाऱ्याना सरकार काय इनाम दिले आहे ह्याची update media ni लोकांना द्यावी.
हायला
उगाच श्रीमती इंदिरा गांधीना सगळं श्रेय देत होते ५० वर्षे!
राजेशा ~ ~ कुठे होतास रे इतकी वर्षे -- भारतमाता आक्रोश करते आहे
23 Sep 2021 - 3:36 pm | शुर
प्रधानमंत्र्या च्या नावाने गोळा केलेला पीएम केयर फंड हा भारत सरकारचा निधी नसून एका धर्मादाय संस्थेचा निधी असल्याचे पीएमओ कडून दिल्ली कोर्टात सांगितलं गेलंय. लोकांना किती मोठा चुना लावला गेलाय, विचार करा.
आजची बातमी.
PM-CARES Fund not a fund of Government of India, Delhi HC told-https://indianexpress.com/article/cities/delhi/pm-cares-fund-not-a-fund-...
23 Sep 2021 - 3:54 pm | Rajesh188
इथे पण लोकांना मूर्ख बनवायचे उद्योग.फेकाफेक,खोटे बोलणे हेच भारत सरकार च वैशिष्ट आहे काय.
24 Sep 2021 - 3:35 am | निनाद
मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील गायरातगंज तहसीलमधील शासकीय प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पवन सेन या विद्यार्थ्यावर निशाद बेगम नावाच्या त्याच्या शिक्षिकेच्या सूचनेनुसार काही लोकांनी हल्ला केला. विद्यार्थ्याने शाळेत गंध परिधान केल्यामुळे हा हल्ला झाला. ही मारहाण इतकी भयंकर होती की विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
24 Sep 2021 - 1:14 pm | Rajesh188
Bjp चे सरकार आहे कायदा आणि सुव्यवस्था बिलकुल नाही.एक शिक्षिका stundent ला मारत आहे कायद्याचा धाक राहिला नाही.
लगेच तबोडतोप mp चे राज्य सरकार केंद्राने बरखास्त करावे.
24 Sep 2021 - 1:17 pm | रावसाहेब चिंगभूतकर
मुसलमान शिक्षिकेने हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे.
24 Sep 2021 - 10:35 am | माईसाहेब कुरसूंदीकर
मोदी अमेरिका दौर्यावर आहेत. कमला हॅरिस ह्यांच्याबरोबर त्यांची भेट झाली. बायडेन ह्यांच्याबरोबर भेट अजुन व्हायची आहे.
एक बाळबोध प्रश्न- ओबामा २०१५ साली भारतात आले होते. स्वागताला खुद्द मोदी विमानतळावर हजर होते. / नंतर ट्रम्प अहमदाबाद येथे आले तेव्हाही मोदी विमानतळावर स्वागताला हजर होते. अमेरिकेचा अध्यक्षाने देशप्रमुखांची भेट विमानतळावर घ्यायची नाही असा तेथील शिष्टाचार आहे का?
24 Sep 2021 - 11:47 am | रावसाहेब चिंगभूतकर
बहुधा असावा. अमेरिकन अध्यक्षाने विमानतळावर जाऊन कुणाचीही भेट घेतल्याचे निदान मी तरी पाहिलेले नाही. कदाचित अमेरिका सुपरपॉवर असल्याने तसे केले जात असावे. सध्या वेगवेगळ्या 180 देशांचे राष्ट्रप्रमुख UNO साठी अमेरिकेत उतरत असल्याने तसेही he will be stretched.
24 Sep 2021 - 12:32 pm | कपिलमुनी
नेहरूना दोन वेळा रीसीव्ह करायला अमेरिकन प्रेसिडेंट आले होते.